मुंबई | प्रतिनिधी —
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधून मायभूमीकडे
परतण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाली आहे. मात्र, या संकटकाळात काही
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
विमान कंपन्यांनी तिकीट दरात प्रचंड वाढ केल्याने नेटीझन्समधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
श्रीनगरहून मुंबई आणि इतर शहरांकडे जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर तब्बल तीनपट वाढले आहेत.
काही प्रवाशांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत 56,000 रुपयांपर्यंत वाढलेले तिकीटदर दाखवले आहेत.
संकटकाळात ‘संधी’ शोधणाऱ्या या प्रवृत्तीवर नेटीझन्सनी कठोर शब्दांत टीका केली आहे.
ही बाब लक्षात घेत नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) ने 23 एप्रिल रोजी महत्वाचे आदेश
जारी करत विमान कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तिकीट दर न वाढवणे,
तसेच तिकीट रद्द/पुन्हा बुकिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय, श्रीनगरहून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.
एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी मिळून श्रीनगरहून उड्डाण करणारी चार अतिरिक्त विमाने उपलब्ध करून दिली आहेत,
त्यातील दोन मुंबईसाठी आणि दोन दिल्लीसाठी असणार आहेत.
सध्या हजारो पर्यटक आणि अमरनाथ यात्रेसाठी आलेले भाविक श्रीनगरमध्ये अडकले आहेत.
त्यांच्यासाठी ही अतिरिक्त सेवा उपयोगी ठरणार आहे. DGCA च्या आदेशामुळे काहीसा दिलासा मिळाला असला,
तरी एअरलाईन्सकडून ‘संकटात नफा’ हे वर्तन थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhavatiya-cruel-stomach/