श्रीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान – सलग 56वे वर्ष, 700 हून अधिक वारकरी सहभागी

श्रीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान – सलग 56वे वर्ष, 700 हून अधिक वारकरी सहभागी

शेगाव प्रतिनिधी

श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी

श्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.

Related News

या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सलग 56वे वर्ष असून,

यामध्ये 700 हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.

रथ, मेणा, अश्व, टाळकरी, पताकाधारी अशा पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत,

“जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते” व “श्रीहरी विठ्ठल”

या नामजपाच्या गजरात पालखीचे पंढरपूरकडे मंगल प्रस्थान झाले.

टाळ-मृदंगाच्या निनादात, भक्तीभावाने भारलेल्या वातावरणात हा सोहळा पार पडला.

श्रीची पालखी तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास करत सुमारे 725 किलोमीटरचे अंतर पार करून

4 जूलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूरमध्ये 4 जुलै ते 9 जुलै दरम्यान

श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा मुक्काम असणार आहे.

परतीचा प्रवास 10 जुलै रोजी सुरू होणार असून, पंढरपूर ते शेगाव हे सुमारे 550 किलोमीटरचे

अंतर पायी पार करून, 30 जुलै रोजी खामगाव येथे मुक्काम केल्यानंतर,

31 जुलै (गुरुवार) रोजी श्रीची पालखी शेगावला पोहोचणार आहे.

एकूण 1300 किलोमीटरचा पायी प्रवास भक्तिभावाने करणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही एक अद्वितीय आध्यात्मिक यात्रा ठरणार आहे.

READ MORE HERE https://ajinkyabharat.com/balapuramadhil-three-rahivashancha-death/

Related News