उत्तराखंडच्या काही भागांमध्ये बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री झालेल्या
मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले. यात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे.
तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेक मार्गावरील भीमभालीजवळ झालेल्या
Related News
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
अकोला शहरात सार्वजनिक भीम जयंती समितीतर्फे रॅलीचे भव्य आयोजन; निळ्या भीमसागराची उसळ
अकोल्यात काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद;
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये पुन्हा वादळ, शिंदे आणि अजितदादा कार्यक्रमातून वगळले
“माचिस नाही दिली म्हणून क्रूर हत्याकांड! दिल्लीत दोन जणांचा पाठलाग करून खून”
BMC निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का; संजना घाडी शिंदे गटात दाखल
वाढदिवसाच्या केकवर गुन्ह्यांची कलमे! भांडुपच्या गुंडाची ‘गुन्हेगारी थाटात’ पार्टी,
बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
पेट्रोल पंपवर घटतौलीची तक्रार महागात पडली; ग्राहकाला लाठ्यांनी मारहाण, 3 सेल्समन अटकेत
भूस्खलनामुळे केदारनाथ खोऱ्याशी संपर्क तुटला आहे.
येथे सुमारे ४५० लोक अडकून पडले आहेत, तर केदारनाथ महामार्ग सोनप्रयाग
आणि गौरीकुंड दरम्यान वाह्न गेला आहे. यामुळे चार धाम यात्रा ठप्प झाली आहे.
केदारनाथ मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे यात्रेकरूंच्या
सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रा थांबवण्यात आली आहे,
असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
केदारनाथमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे भिंबलीजवळील रस्त्याचा काही भाग
वाहून गेला आहे. एनडीआरएफने सोनप्रयाग आणि भिंबली दरम्यानच्या मार्गावर
अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्यास कालपासून सुरुवात केली होती.
शुक्रवारी सकाळपासून भारतीय हवाई दल केदारनाथ येथे सुरू असलेल्या
बचावकार्यात सहभागी झाले. भारतीय हवाई दलाने उत्तराखंडच्या केदार खोऱ्यात बचाव
आणि मदत कार्य करण्यासाठी एक चिनूक आणि एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टर
तैनात करण्यात आले आहे. ते राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून
बचावकार्य करतील, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुद्रप्रयागचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी एन के राजवर म्हणाले,
“गौरीकुंडपासून सुरू होणारा १६ किमीचा केदारनाथ ट्रेक ट्रेक मार्ग घोडा पडाव, लिंचोली,
बडी लिंचोली आणि भिंबली येथे खराब झाला आहे. रामबाडाजवळील दोन पूलही
काल रात्री वाहून गेले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने भिंबळीच्या पलीकडे
अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी उंच डोंगरातून १ किमीचा पर्यायी मार्ग तयार केला आहे.
एसडीआरएफचे कमांडंट मणिकांत मिश्रा यांनी सांगितले की,
केदारनाथ यात्रेच्या मार्गावर भिंबली, रामबाडा, लिंचोली येथे अडकलेल्या
सुमारे ४२५ लोकांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
सोनप्रयाग आणि भिंबली दरम्यान अडकलेल्या सुमारे १,१०० लोकांना
पर्यायी मार्गाने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/neet-exam-will-not-be-held-again/