नवी दिल्ली, ८ मे – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे
पाकिस्तानात ठाण मांडलेल्या नऊ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली. या घडामोडीनंतर
भारत-पाकिस्तानमधील तणाव टोकाला गेला असून देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
Related News
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
हिना खानने इफ्तारसाठी बनवले पारंपरिक फिरणी, चाहत्यांना दिला स्वादिष्ट अनुभव
हिना खान ही अभिनेत्री फक्त अभिनय कौशल्यासाठीच नाही, तर तिच्या पाककौशल्यास...
Continue reading
लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी; जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार – आदिती तटकरे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य ...
Continue reading
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट आयोजित केला.
यामध्ये नागरिकांना हवाई हल्ल्याच्या धोका निर्माण झाल्यास स्वत:चा जीव कसा वाचवायचा,
याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवण्यात आला,
ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि काळजी निर्माण झाली – नेमका हा सायरन कधी वाजतो? आणि जीव वाचवण्यासाठी किती वेळ मिळतो?
सायरन कधी वाजतो?
जेव्हा शत्रू राष्ट्राकडून रॉकेट, लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्र भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करतात, तेव्हा हवाई
दलाचे रडार तत्काळ ते ओळखतात. त्या आधारे संभाव्य हल्ल्याच्या ठिकाणी ६० सेकंदांचा एअर रेड सायरन वाजवला जातो.
या सायरनचा अर्थ – नागरिकांनी त्वरीत सुरक्षित स्थळी जायला हवं.
जीव वाचवण्यासाठी मिळतो किती वेळ?
हल्ल्याची शक्यता असलेल्या भागात हा सायरन वाजवण्यात येतो, ज्यामुळे लोकांना फक्त सुमारे एक मिनिट
मिळतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. हा सायरन वाजल्यावर तातडीने जवळच्या बंकरमध्ये किंवा सुरक्षित इमारतीच्या खालील मजल्यावर जाण्याचा सल्ला दिला जातो.
सायरन मागचं तंत्रज्ञान काय?
रडार प्रणाली शत्रूच्या हालचाली ओळखते आणि त्या आधारे तात्काळ रेड अलर्ट जारी केला जातो.
त्यानंतर स्थानिक यंत्रणांमार्फत सायरन सक्रिय केला जातो. ही प्रणाली मुख्यतः लष्करी तळ, विमानतळ तसेच संवेदनशील नागरी भागांमध्ये कार्यरत असते.
भारतीय नागरिकांना अशा संकट काळात सजग राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/district-chief-srirang-pinjarkar-yancha-call/