मुंबई, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, आता स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Related News
'तू एकतर भ्रष्ट आहेस किंवा मूर्ख!' पत्रकाराच्या प्रश्नावरून डोनाल्ड ट्रम्प संतापले; भर मुलाखतीतून वॉकआऊट
निवडणूक गैरव्यवहारांच्या आरोपांवर पुरा...
Continue reading
भीषण 7.7 तीव्रतेच्या भूकंपाने फिलीपिन्स हादरले; शाळेच्या पहिल्याच दिवशी छत कोसळून मोठी दुर्घटना
फिलीपिन्समध्ये सोमवारी सकाळी झालेल्या 7.7 रिश्टर स्क...
Continue reading
उन्हाळ्यात वजन कमी करायचे आहे? आहारात समाविष्ट करा सत्तूपासून बनणारे हे 6 पौष्टिक पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्याला पोषक ठरणारे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल अस...
Continue reading
केरळ कार अपघातातील हृदयद्रावक कहाणी; ऐनवेळी कार बदलल्याने 6 वर्षीय मुलगी बचावली, पती-पत्नीसह तिघांचा मृत्यूकोझिकोड/दुबई : आयुष्यातील काही क्षण असे...
Continue reading
‘Peddi’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; अवघ्या चार दिवसांत 233 कोटींचा टप्पा पार
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘
Continue reading
प्रेशर कुकरमध्ये बनवा रेस्टॉरंट-स्टाइल तंदुरी रोटी; घरच्या घरी मिळवा धुरकट आणि कुरकुरीत चव
प्रेशर कुकरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखी तंदुरी रोटी; जाणून...
Continue reading
व्यस्त आठवड्यात झटपट बनवा पारंपरिक राजस्थानी पापडची भाजी; चव, परंपरा आणि सोपेपणाचा अनोखा संगम
व्यस्त दिवसांसाठी झटपट पापडची भाज...
Continue reading
IMD चा मोठा इशारा! मान्सूनचा तडाखा वाढणार; मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने अनेक राज्यांना अलर्ट
IMD चा मोठा इशारा! पुढील 96 तास मुसळधार प...
Continue reading
Ladki Bahin Yojana तील पात्र महिलांना मोठा दिलासा? बच्चू कडूंचा सरकारला 30 जूनपर्यंत अल्टिमेटम
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री Lad...
Continue reading
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची लॉटरी? मोदी मंत्रिमंडळ विस्तारात पंजाबच्या दोन मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची संधी? मोदी सर...
Continue reading
वजनापलीकडील धोका! दीर्घकालीन सूज कशी बिघडवते यकृत, हृदय आणि रक्तातील साखरेचे आरोग्य?
मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयविकार यांसारख्या आजारांबाबत चर्चा झाली की बहुतेक वेळा लक्ष शरीराच्...
Continue reading
PM मोदींनी भेट दिलेल्या 7.5 कॅरेटच्या हिऱ्याने जिंकले जिल बायडेन यांचे मन; किंमत समजताच बदलला निर्णयवॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी य...
Continue reading
काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं होतं की,
“शेतकरी कर्ज घेतात आणि त्यातून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर खर्च करतात.
” तसेच, “भिकारी एक रुपया घेत नाही, पण आम्ही एक रुपयात पीक विमा देतो,”
असे वादग्रस्त विधान देखील त्यांनी याआधी केले होते. या विधानांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
विरोधकांनी याला मुद्दा बनवत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
यानंतर कोकाटेंनी जाहीर माफी मागितली होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांना समज दिली होती.
मात्र, यावर राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अजितदादांनी समज दिल्यानंतर ही
माणिकराव कोकाटेंचं बेताल वक्तव्य थांबत नाही. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवणं हे शेतकऱ्यांच्या अपमानासारखं आहे.
त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे.”
त्याचप्रमाणे कांद्याच्या निर्यातीसंदर्भातही शेट्टींनी कोकाटेंना सुनावलं.
“जे आयात शुल्क त्यांनी आत्ताच शून्यावर आणलं, ते जर दोन महिने आधी केलं असतं,
तर शेतकऱ्यांचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात विकला गेला असता,” असं ते म्हणाले.
अजित पवारांवरही निशाणा:
राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधला.
“अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना असूनही
त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं खोटं आश्वासन दिलं. हे सरळसरळ गंडवणं आहे,” असा आरोप शेट्टींनी केला.
“राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे, असं सांगितलं जातं, पण तरीही ८६ हजार कोटींचे ‘शक्तीपीठ’ सारखे प्रकल्प राबवले जात आहेत.
हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांशी विश्वासघात आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
शेट्टींनी स्पष्ट इशारा दिला की, “आता आम्ही थेट कार्यक्रमात जाऊन महायुतीच्या नेत्यांना जाब विचारणार आहोत.
” प्रहार जनशक्ती पक्षानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील
आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सरकारसमोर दबाव वाढल्याचं चित्र आहे.