मुंबई, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, आता स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Related News
प्रतिनिधी: रामेश्वर कावरे | उमरा, अकोट तालुका
अकोट तालुक्यातील उमरा गावाच्या सीमेवर असलेल्या ११ केव्ही कासोद फिडरवरील रोहित्राजवळ,
एका मेंढीपाळकावर भीषण प्रसंग ओढावला. दि. १२ एप्...
Continue reading
मुर्तीजापुर | अधर खान
शासनाच्या निद्रिस्त अवस्थेला धक्का देण्यासाठी, आणि शेतकरी व दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार
जनशक्ती पक्षाने ११ एप्रिलच्या रात्री मुर्तीजापुर येथे जोरदार मशा...
Continue reading
अकोला –
एका वयोवृद्ध व्यक्तीची बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेलेल्या अनोळखी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात
अकोला पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आलं आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडवली ...
Continue reading
नवी दिल्ली –
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे भारतात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले आहेत.
सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 93,390 रुपये, तर 2...
Continue reading
जळगाव –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना डंपरद्वारे ठार मारण्याची धमकी देणारा खळबळजनक ई-मेल मुख्यमंत्री
कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये केवळ जिल्हाधिका...
Continue reading
अहमदाबाद –
शहरातील खोखरा परिसरात एका उंच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी इलेक्ट्रिक
कुकरमुळे अचानक आग लागली. या आगीत दाट धूर संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरला होता.
या दर...
Continue reading
अकोला, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोला शहरात
तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक
...
Continue reading
अकोट, ता. १२ एप्रिल –
अकोट तालुका व शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती
आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बुद्धगया येथील महाबोधी ...
Continue reading
मुंबई: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात १६,००० पानी
आरोपपत्र दाखल केले असून, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
या आरोपपत्रात सैफच्या पत्नी करीन...
Continue reading
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या
वतीने 14 व 15 एप्रिल 2025 रोजी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट' या विशेष
मोफत सहल...
Continue reading
किन्हीराजा (वार्ताहर) –
येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने श्रीकृष्ण
सोनुने यांनी शाळेला दीड लाख रुपये किंमतीचे आरोप्लॅन्ट भेट दि...
Continue reading
लाखपुरी (ता. मुर्तिजापूर),
दि. १२ एप्रिल — लाखपुरी येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सिद्धार्थ बौद्ध विहार, बस स्टँड चौक येथे आय...
Continue reading
काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं होतं की,
“शेतकरी कर्ज घेतात आणि त्यातून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर खर्च करतात.
” तसेच, “भिकारी एक रुपया घेत नाही, पण आम्ही एक रुपयात पीक विमा देतो,”
असे वादग्रस्त विधान देखील त्यांनी याआधी केले होते. या विधानांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
विरोधकांनी याला मुद्दा बनवत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
यानंतर कोकाटेंनी जाहीर माफी मागितली होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांना समज दिली होती.
मात्र, यावर राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अजितदादांनी समज दिल्यानंतर ही
माणिकराव कोकाटेंचं बेताल वक्तव्य थांबत नाही. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवणं हे शेतकऱ्यांच्या अपमानासारखं आहे.
त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे.”
त्याचप्रमाणे कांद्याच्या निर्यातीसंदर्भातही शेट्टींनी कोकाटेंना सुनावलं.
“जे आयात शुल्क त्यांनी आत्ताच शून्यावर आणलं, ते जर दोन महिने आधी केलं असतं,
तर शेतकऱ्यांचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात विकला गेला असता,” असं ते म्हणाले.
अजित पवारांवरही निशाणा:
राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधला.
“अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना असूनही
त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं खोटं आश्वासन दिलं. हे सरळसरळ गंडवणं आहे,” असा आरोप शेट्टींनी केला.
“राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे, असं सांगितलं जातं, पण तरीही ८६ हजार कोटींचे ‘शक्तीपीठ’ सारखे प्रकल्प राबवले जात आहेत.
हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांशी विश्वासघात आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
शेट्टींनी स्पष्ट इशारा दिला की, “आता आम्ही थेट कार्यक्रमात जाऊन महायुतीच्या नेत्यांना जाब विचारणार आहोत.
” प्रहार जनशक्ती पक्षानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील
आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सरकारसमोर दबाव वाढल्याचं चित्र आहे.