दहिगाव अवताडे, शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ग्राम दहिगाव
अवताडे येथे एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात गावातून शेतकऱ्यांची
दिंडी काढून घोषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
यानंतर विशेष शिबिराचे आयोजन करून शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे महत्त्व समजावण्यात आले.
फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता,
पीक विमा, पोकरा योजना, अनुदान अशा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तात्काळ काढावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या विशेष शिबिरात सरपंच रविकिरण काकड, पोलिस पाटील अरविंद अवताडे, मंडळ महसूल
अधिकारी संजय साळवे, तलाठी डाबेराव, कृषी सहाय्यक अनिता डाबेराव, तंटामुक्त समिती
अध्यक्ष संतोष तायडे, उपसरपंच धरमसिंग सोळंके, ग्रामविकास अधिकारी राठोड मॅडम,
रास्त भाव दुकान चालवणारे मोहन अग्रवाल, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अविनाश भारसकडे,
माजी सैनिक सुधाकर सुरळकर, कोतवाल ऋषिकेश चव्हाण तसेच अक्षय अवताडे,
शशिकांत बोरसे, शुभम इसापुरे, कैलास अवताडे यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमात जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिबिराला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.