मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी (दि. ३ एप्रिल)
दुपारी एका ३० वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
अक्षय सुनीलराव देशमुख (वय ३०, रा. जामठी बु.) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर रेल्वे पोल क्रमांक ६२१/९ ते ६२२
दरम्यान गाडी क्रमांक १२८३३ डाऊन अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस समोर उडी घेऊन त्याने आपले जीवन संपवले.
अक्षय नुकताच रेल्वे ए.सी. कोच अटेंडंट म्हणून नागपूर येथे कंत्राटी पद्धतीने नोकरीस लागला होता.
गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचे वडील सुनील देशमुख यांनी त्याला रेल्वे स्थानकावर सोडले होते.
मात्र काही वेळातच अपघाताची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
अक्षयचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते आणि त्याला अवघ्या एक महिन्याचा मुलगा आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट होता.
तसेच, काही दिवसांपूर्वी शासनाने त्यांच्या दाताळा येथील शेतातील पिकांवर आणि राहत्या
घरावर बुलडोझर चालवला होता. या तणावातूनच अक्षयने टोकाचे पाऊल उचलल्याचा
प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.