मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी (दि. ३ एप्रिल)
दुपारी एका ३० वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
अक्षय सुनीलराव देशमुख (वय ३०, रा. जामठी बु.) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
Related News
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर रेल्वे पोल क्रमांक ६२१/९ ते ६२२
दरम्यान गाडी क्रमांक १२८३३ डाऊन अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस समोर उडी घेऊन त्याने आपले जीवन संपवले.
अक्षय नुकताच रेल्वे ए.सी. कोच अटेंडंट म्हणून नागपूर येथे कंत्राटी पद्धतीने नोकरीस लागला होता.
गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचे वडील सुनील देशमुख यांनी त्याला रेल्वे स्थानकावर सोडले होते.
मात्र काही वेळातच अपघाताची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
अक्षयचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते आणि त्याला अवघ्या एक महिन्याचा मुलगा आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट होता.
तसेच, काही दिवसांपूर्वी शासनाने त्यांच्या दाताळा येथील शेतातील पिकांवर आणि राहत्या
घरावर बुलडोझर चालवला होता. या तणावातूनच अक्षयने टोकाचे पाऊल उचलल्याचा
प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.