मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी (दि. ३ एप्रिल)
दुपारी एका ३० वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
अक्षय सुनीलराव देशमुख (वय ३०, रा. जामठी बु.) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर रेल्वे पोल क्रमांक ६२१/९ ते ६२२
दरम्यान गाडी क्रमांक १२८३३ डाऊन अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस समोर उडी घेऊन त्याने आपले जीवन संपवले.
अक्षय नुकताच रेल्वे ए.सी. कोच अटेंडंट म्हणून नागपूर येथे कंत्राटी पद्धतीने नोकरीस लागला होता.
गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचे वडील सुनील देशमुख यांनी त्याला रेल्वे स्थानकावर सोडले होते.
मात्र काही वेळातच अपघाताची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
अक्षयचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते आणि त्याला अवघ्या एक महिन्याचा मुलगा आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट होता.
तसेच, काही दिवसांपूर्वी शासनाने त्यांच्या दाताळा येथील शेतातील पिकांवर आणि राहत्या
घरावर बुलडोझर चालवला होता. या तणावातूनच अक्षयने टोकाचे पाऊल उचलल्याचा
प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.