अकोला जिल्ह्यातील कारंजा (रमजानपूर) आणि नया अंदुरा येथील
शेतकऱ्यांसाठी नवीन संकट उभे राहिले आहे.
लघु पाटबंधारे विभागामार्फत कारंजा (रम) धरण (बॅरेज) बांधण्यात आले, परंतु या प्रकल्पामुळे
Related News
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
शेतकऱ्यांचे शेतरस्ते पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत.
त्यामुळे शेतीची मशागत आणि पेरणी करणे कठीण झाले आहे.
नवीन रस्त्यांसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
या गंभीर परिस्थितीमुळे कारंजा-रमजानपूर आणि नया अंदुरा येथील सुमारे २० शेतकऱ्यांनी धरणाच्या
भिंतीजवळ बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची त्वरित सोय व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा अकोला जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,
तहसीलदार बाळापूर, लघु पाटबंधारे विभाग तसेच स्थानिक आमदार आणि खासदार
यांच्याकडे निवेदने सादर केली होती. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.
त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप
या प्रश्नावर प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन नवीन रस्त्यांची सोय केली नाही,
तर त्याचा मोठा परिणाम शेतीवर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
शासन आणि संबंधित विभागाने या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित शेतकऱ्यांच्या
समस्या सोडवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरू केलेले हे आंदोलन
त्यांच्या जीवनावश्यक गरजा भागवण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे.