मुर्तिजापूर: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारात अन्न,
वस्त्र आणि निवाऱ्याचा समावेश आहे. मात्र, शासन गरीब अतिक्रमण धारकांना हक्क प्रदान करण्यास
टाळाटाळ करत असल्याचा आरोप समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराज शेंडे यांनी केला आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
राज्यघटनेच्या अनुच्छेद 12 नुसार SDO (उपविभागीय अधिकारी) यांनी सरकारी E आणि F क्लास जमिनीवरील
अतिक्रमण धारकांना महसूल कायदा 1966 च्या कलम 51 अंतर्गत नियमबद्ध करून मालकी हक्क द्यावा,
अशी मागणी शेंडे यांनी केली आहे. शासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास “करो या मरो” आंदोलन छेडण्यात येईल,
असा इशाराही त्यांनी दिला.
शासनाकडून दुर्लक्षाचा आरोप
शेंडे यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, राजकीय दबावामुळे श्रीमंत भांडवलदार आणि राजकारणी लोकांना
महसूल कायद्यातील कलम 51 च्या आधारे सरकारी जमिनीचा मालक बनवले जाते.
मात्र, 30 ते 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब जनतेच्या अतिक्रमणाचे नियमितीकरण करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
आंदोलनाचा इतिहास
समाज क्रांती आघाडीने मागणीसाठी अनेकदा आंदोलन केले आहे:
- 15 ऑगस्ट 2019: आमरण उपोषण
- 4 ऑक्टोबर 2019: मोर्चा
- 15 ऑगस्ट 2024: पुन्हा आमरण उपोषण
यासोबतच, 25 मंजूर प्रस्ताव ऑनलाईन असूनही शासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
त्यामुळे शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.
मोर्चात असंख्य नागरिकांचा सहभाग
या आंदोलनात समाज क्रांती आघाडीचे जिल्हा संघटक सुदामभाऊ शेंडे,
तसेच निरंजन गवई, धममनंद तायडे, अजाबराव दामले, बंडू डोंगरे, नंदू नानिर, विनोद इंगळे, सतीश इंगळे,
धनराज सावंत, राजू अंभोरे, दिवाकर इंगळे, प्रवीण चाहकर, दादाराव सरदार, प्रकाश जमनिक,
चंद्रभान घने आदींसह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक उपस्थित होते.
— मा. सुदाम शेंडे (जिल्हा संघटक, समाज क्रांती आघाडी)
दिनांक: 27/02/2025
Read more news here : https://ajinkyabharat.com/swargate-rape-case/