राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५
ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
१५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल अॅपवर
एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी
निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत
अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.
किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.
सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे
सी-व्हिजिल अॅप हे कोणत्याही अॅपस्टोअरमधून डाऊनलोड
करता येते. या अॅपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत
तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे
चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. राज्य शासनाच्या
व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात
आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू
इत्यादी बाबतीत एकूण २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता
जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी
अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध
राजकीय पक्षांच्या एकूण १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात
आले असून यामध्ये व्हिडिओ, क्रिएटिव्ह व ऑडिओ जाहिरातींचा
समावेश आहे.