राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५
ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
१५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल अॅपवर
एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी
निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत
अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.
किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.
सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे
सी-व्हिजिल अॅप हे कोणत्याही अॅपस्टोअरमधून डाऊनलोड
करता येते. या अॅपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत
तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे
चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. राज्य शासनाच्या
व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात
आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू
इत्यादी बाबतीत एकूण २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता
जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी
अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध
राजकीय पक्षांच्या एकूण १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात
आले असून यामध्ये व्हिडिओ, क्रिएटिव्ह व ऑडिओ जाहिरातींचा
समावेश आहे.