नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई यांच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट आहे.
अमरावतीच्या मातीतून आलेल्या गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई याही या गौरवाच्या क्षणी भावुक झाल्या.
पण याच वेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत एक ठाम मतही मांडलं – “देशात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात.”
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
कमलाताई म्हणाल्या, “बॅलेट पेपर म्हणजे जनतेचा खरा कौल. आधी याच पद्धतीने निवडणुका होत असत
. ईव्हीएममुळे शंका निर्माण होतात. बाबासाहेबांनी जनतेला केंद्रस्थानी ठेवलं आहे,
तर मग त्यांच्या मतदानाच्या विश्वासाला तडे का द्यायचा?”
भूषण गवई उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार असून,
त्यांच्या मातोश्रींनी केलेल्या विधानामुळे बॅलेट पेपरविषयी सुरू असलेल्या चर्चेला नवा आयाम मिळालाय.
विशेषतः महाविकास आघाडी व इतर पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमविरोधात प्रश्न उपस्थित होत असताना,
एका सरन्यायाधीशाच्या घरातून आलेला हा आवाज महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते उत्तम जाणकर यांनी बॅलेट पेपरच्या मागणीसाठी मोठं आंदोलन केलं होतं.
आता कमलाताई गवई यांच्या वक्तव्यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ईव्हीएम व बॅलेट पेपरवरील याचिकेच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागून राहिलं आहे.
READ MORE NEWS