सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. १० : राष्‍ट्रीय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाने दिलेल्‍या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी सजग

राहून दिलेल्‍या सुचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच,

चुकीची माहिती, अफवा पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसे आढळल्यास वेळीच खंडन करावे,

Related News

असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले.

सदयस्थितीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेले निर्देश आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

घेण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

सहाय्यक पोलीस अधीक्षक अमल मित्तल, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्‍हाधिकारी

तथा उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, सर्व उपविभागीय अधिकारी , सर्व तहसीलदार ,

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम , जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक , जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी ,

सर्व नगरपालिका मुख्‍याधिकारी यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार म्हणाले की, सर्व यंत्रणांनी परस्परांशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वायरलेस यंत्रणा, २४ बाय ७ नियंत्रण कक्ष व सर्व सुरक्षा यंत्रणा ’अलर्ट’ ठेवाव्यात.

चुकीची माहिती मिळून कुठेही अव्‍यवस्‍था निर्माण होता कामा नये. अफवा पसरू नयेत याची खबरदारी घ्यावी.

अधिकृत संदेश व संकेतस्थळाबाबत नागरिकांची जाणीवजागृती करावी.

जिल्ह्यात मान्सूनपूर्व नालेसफाई आदी कामे महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी विहित मुदतीत पूर्ण करावी.

रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, निवारा केंद्रे, आरोग्य केंद्रे सुसज्ज ठेवावी. पुरेसा औषध साठा ठेवावा.

सर्वत्र पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा. दूषित पाणी, अस्वच्छता, रोगराई पसरू नये यासाठी उपाययोजना कराव्यात.

हवामान खात्याकडून येणा-या सूचना सर्वदूर प्रसारित व्हाव्यात. जलप्रकल्पांच्या ठिकाणी आवश्यक सर्व दुरुस्ती वेळेत पूर्ण कराव्यात.

आरोग्य विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी

यंत्रणांनी नियंत्रण कक्ष सुरू करून जिल्हा नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवावा.

नदी नाल्याच्या प्रवाहास अडथळा असलेले अतिक्रमण काढणे, घनकचरा व्यवस्थापन, संभाव्य धोका टाळण्यासाठी

वाळलेली झाडे विहित प्रक्रिया पूर्ण करून तोडणे आदी बाबींची वेळेत पूर्तता करावी,

असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. अजित कुंभार यांनी दिले आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/mission-sinduramadhye-300-jawan-sarahdhadi/

Related News