विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या
३ उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला.
या निवडणुकीत मविआची काही मते फुटली असा अंदाज आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
त्यात देवेंद्र फडणवीसांनी मविआचे २० आमदार महायुतीकडे आल्याने
त्यांचा फुगा फुटला असं विधान केले.
त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधत
देवेंद्र फडणवीसांच्या अटकेची मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, तुमचा भ्रष्टाचार, तुमचा पक्ष आणि हे सरकार भ्रष्टाचारातून आलेले आहे.
पैसा फेको, तमाशा देखो असं आहे.
देवेंद्र फडणवीस बोलतात महाविकास आघाडीचे २० आमदार फोडले,
हे चिंचोके देऊन फोडले का?,
केंद्रीय गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नकोय ना, मग देवेंद्र फडणवीसांना अटक करा.
२० आमदार फोडले, फडणवीसांनी किती पैसे दिले,
ईडी, सीबीआय चौकशी फडणवीसांच्या मागे लावा.
तुम्ही सच्चे असाल ना, पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसांची करा
असं राऊतांनी अमित शाहांना आव्हान केले.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत महायुतीने ९ उमेदवार दिले होते
तर मविआकडून ३ उमेदवार रिंगणात होते.
मविआत काँग्रेसकडून १, ठाकरे गटाकडून १ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं
शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता.
तर महायुतीने पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरख,
सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली.
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाने प्रत्येकी २ उमेदवार उभे केले.
लोकसभेचा निकाल पाहता महायुतीची मते फुटतील
असा दावा मविआकडून वर्तवला जात होता.
परंतु या निवडणुकीत मविआचेच काही आमदार फुटल्याचे समोर आले.
त्यावरून आता फडणवीस-राऊतांमध्ये शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला.
Read also: https://ajinkyabharat.com/take-care-of-dengue-heat-health/