चोहोट्टा बाजार मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा अंतर्गत समाधान शिबिर व जनसंवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती, चोहोट्टा बाजार येथे करण्यात आले.शिबिरात फेरफार अदालत, रस्ता अदालत आणि जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात आली. यामध्ये देवर्डा येथील शेतातील पाण्याचा बांध मोकळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शेतकऱ्यांना प्रशस्तिपत्रे देण्यात आली, तसेच १५ सातबारे वाटप करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान नागरिकांना जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिनल रेकॉर्ड, अधिवास व उत्पन्न दाखले मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यासोबतच आरोग्य, पुरवठा, भूमी अभिलेख, पंचायत समिती, कृषी व महावितरण विभागांचे स्टॉल उभारून विविध योजना नागरिकांना समजावून सांगितल्या.तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी सांगितले की, चोहोट्टा बाजार मंडळातील १५० शेतरस्त्यांचे सीमांकन करून अतिक्रमणमुक्त करण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक सुलभ होईल आणि रस्त्यांचे कायमस्वरूपी संरक्षण होईल.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार रणधीरभाऊ सावरकर होते. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, सह-निबंधक नितीन कुलकर्णी, ए यु खान, नायब तहसीलदार मनोज मानकर, सुधीर थिटे, गटविकास अधिकारी वानखडे, भूमी अभिलेख अधीक्षक सोनलाल पालवे, तालुका कृषी अधिकारी व मंडळातील सर्व सरपंच उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसिलदार सुधीर थिटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी अतुल वानखडे यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी चोहोट्टा बाजार मंडळाचे अधिकारी विशाल शेरेकर, ग्राम महसूल अधिकारी महेश सरकटे (चोहोट्टा व केळीवेळी), अतुल वानखडे (हानवाडी), गणेश धात्रक (किनखेड), सचिन चिकार (दनोरी), शिवराज दाभाडे (करोडी), दिपाली तेलगोटे (देवर्डा) आणि महसूलमित्र किशोर राठोड, मीगोपाल अरबट, शिवचरण वानखडे, राजू ओवे यांनी समन्वय साधला.शिबिरात मंडळातील शेकडो नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि कार्यक्रम यशस्वी झाला.
read also : https://ajinkyabharat.com/ekacha-deaddeh-sapadala-dusya-research-suru/