अमरावती: उच्च शिक्षण आणि शिकवणी वर्गाच्या अपुऱ्या सुविधा असल्याने अनेक विद्यार्थी शहरात येतात.
असेच मोठी स्वप्ने घेऊन आलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मात्र, या आत्महत्येसाठी पोलिस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Related News
Kangana Ranaut हिंदू तरुणींवर वादग्रस्त वक्तव्य; सोशल मीडिया पोस्टने नवा वाद पेटण्याची शक्यता
Nagpur Rain: नागपुरात तुफान पाऊस! रस्ते जलमय, सोमलवार शाळेचं मैदान पाण्याखाली; नागरिकांची तारांबळ
मिक्सर सतत खराब होतोय? या 5 गोष्टी चुकूनही मिक्सरमध्ये वाटू नका, मोटरवर येईल मोठा ताण!
दिल्लीतील आंदोलनात परदेशी शक्तींचा हस्तक्षेप? पाकिस्तान-मलेशियातून 500 हून अधिक पोस्ट; सायबर सेलचा मोठा खुलासा
CJP Protest : फडणवीसांचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरील आंदोलनाचे गुन्हे होणार रद्द
सेकंड हँड कार घेताय? सावधान! ओडोमीटरमधील फसवणूक अशी ओळखा काही मिनिटांत
Maruti Brezza Facelift: ब्रेझाचे 4 दमदार व्हेरियंट्स; बजेटनुसार तुमच्यासाठी कोणती कार ठरेल बेस्ट?
मोठी बातमी! E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत नवं आंदोलन; नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी, 4 ऑगस्टला संसदेला घेराव
मोठी बातमी! ‘शेतकऱ्यांना त्रास झाला तरी सहन करू, पण उद्योजकांना नको’; गुलाबराव पाटलांच्या विधानाने खळबळ
उरलेल्या भाज्या आता अजिबात फेकू नका! बनवा हे 4 झटपट आणि स्वादिष्ट पदार्थ
Cabinet Decisions : मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय; ग्रामपंचायतीपासून न्यायालयांपर्यंत मोठ्या घोषणा
मोठी बातमी! मोदींचा व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट; मेटाच्या ग्लोबल हेडला थेट समन्स, नेमकं काय घडलं?
खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप
शहरातील आकाशवाणी केंद्राच्या मागे जलाराम सोसायटीत राहणाऱ्या 11वीतील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली.
मृत विद्यार्थ्याचे नाव प्रसन्न वानखडे असून तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचा रहिवासी होता.
प्रसन्न NEET परीक्षेची तयारी करत होता.
प्रसन्नच्या मामाच्या मते, दीड महिन्यांपूर्वी कार्तिक नावाच्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या वादानंतर, प्रसन्नला खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले.
या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील एका तपास अधिकाऱ्याने कारवाई टाळण्यासाठी पैशाची मागणी केली,
परंतु पैसे न दिल्याने प्रसन्नला वारंवार पोलीस ठाण्यात बोलवून मानसिक त्रास दिला गेला.
नातेवाईकांची मागणी – दोषींवर कारवाई करा!
प्रसन्नने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर आणि खोटी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
या घटनेने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि पोलिसी मनमानीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/shande-yancha-do-or-die-gesture-encroachment-holder/

