मदतीपासून वंचित शेतकऱ्यांकडून निवेदन

वंचित

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मदत निधी, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांच्या अनुदानापासून वंचित राहिल्याचा मुद्दा उठवून तहसीलदारांच्या वतीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक १२ नोव्हेंबर रोजी निवेदन सादर केले आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नैसर्गिक आपत्तीमुळे भरडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मदत निधी विविध तांत्रिक अडचणींमुळे अद्याप मिळाली नाही. एकीकडे शेतपिकांना खुल्या बाजारात किमान आधारभूत किंमत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे शासनाने दिलेली मदत निधी सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचलेली नाही.

निवेदनात सांगण्यात आले आहे की, खरीप हंगाम २०२५, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि रखडलेले अनुदान वितरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related News

शेतकऱ्यांच्या या निवेदनातून प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/maha-e-seva-sangathans-enthusiastic-response-in-bandla-balapur/

Related News