महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचे काम
अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर मुंबईवरुन थेट नागपूर प्रवास आठ
तासांवर येणार आहे. आता पुणे शहराला समृद्धी महामार्गाने जोडण्यात
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पुणे ते शिरुळ
दरम्यान 53 किलोमीटर लांब सहा पदरी फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे.
त्यानंतर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर माध्यमातून पुणे समृद्धी
महामार्गाला जोडण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गासाठी उभारण्यात येणारा फ्लायओव्हर केसनंद गावातून सुरु
होणार आहे. हा मार्ग शिरूरपर्यंत जाणार आहे. या फ्लायओव्हरच्या निर्मितीसाठी
7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच फ्लायओव्हार अहमदनगरवरुन समृद्धी
महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त 2050 कोटी खर्च येणार आहे.
यामुळे या प्रकल्पाचा एकूण खर्च 9565 कोटींवर जाणार आहे. पुणे ते समृद्धी
महामार्गपर्यंतचा रस्ता 250 किलोमीटर असणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडण्याचा
प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुणे से छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय राजमार्ग आतापर्यंत
‘एनएचएआय’ कडून बनवला जात होता. तो आता ‘एमएसआयडीसी’ कडून तयार केला
जाणार आहे. यासाठी एप्रिल महिन्यात ‘एमएसआयडीसी’ सोबत करार झाला होता.
या मार्गामुळे केवळ पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान चांगला संपर्क होणार नाही
तर या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/jaideep-aptela-police-kothadi-till-13th-september/