मालवणमधील राजकोट येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज
यांचा पुतळा पडला. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले जयदीप आपटे
आणि चेतन पाटील यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर
Related News
हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने आरोपी चेतन पाटील याला दिलासा
देत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर आरोपी जयदीप आपटे
याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आपटे हा पाच
दिवसांपासून तर चेतन हा 10 दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. आज त्यांची
मुदत संपल्यानतर पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता,
न्यायालयाने हे आदेश दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला
पुतळा आठ महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली.
तर विरोधकही यावरुन आक्रमक झाले होते. याप्रकरणी बांधकाम सल्लागार
म्हणून काम करणाऱ्या चेतन पाटीलला पोलिसांनी लगेचच अटक केली.
मात्र पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हाँ सुमारे आठवडाबर फरार होता.
अखेर तब्बल 11 दिवसांनी, गेल्या आठवड्यात जयदीप आपटेला अटक करण्यात
पोलिसांना यश आलं. अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांची नजर चुकवत जयदीप हा
त्याची पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात
घेतले. त्याला 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती.
आजा त्याला व आरोपी चेतन पाटील याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
Read also: https://ajinkyabharat.com/ic-814-again-promise-bhovyat/
