प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने पीपीएसची परीक्षा पुढे ढकलली
आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या
Related News
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर हल्लाबोल
केला आहे. योगी सरकार तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करू इच्छित
आहे, असे प्रियंका गांधी यांन म्हटले आहे. यासंदर्भात प्रियांका
गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, यूपी पीसीएस प्रिलिम्सची
परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. यूपी टेक्निकल
एज्युकेशन सर्व्हिसेस-२०२१ च्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या
आहेत. तसेच, वारंवार परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटी आणि
भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणे, हे
भाजप सरकारचे धोरण बनले आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
याचबरोबर, प्रियांका गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून
भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, “स्पर्धक विद्यार्थीही
यूपीपीसीएस परीक्षा दोन दिवसांत घेण्याच्या प्रस्तावाला विरोध
करत आहेत.
त्यांचा युक्तिवाद बरोबर आहे की, हीच परीक्षा दोन दिवसांत
घेतली, तर नॉर्मसाइजेशनच्या नावाखाली पुन्हा स्केलिंगचा खेळ
सुरू होईल. एकीकडे भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे,
नोकऱ्या न देऊन मागासवर्गीय, दलित आणि वंचितांचा
आरक्षणाचा अधिकारही हिरावून घेत आहे. “दरम्यान, उत्तर प्रदेश
लोकसेवा आयोगाने प्रांतीय नागरी सेवा प्राथमिक परीक्षा अनिश्चित
काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. परीक्षा पुढे
ढकलण्याची यंदाची ही दुसरी वेळ आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/beneficiaries-of-adkale-government-scheme-with-code-of-conduct/