अकोल्यात आठ वर्षांपासून विकास फाउंडेशनकडून उपक्रम
विधवा, परितक्ता, घटस्फोटिता महिलेने काय घालावे, कुंकू लावावे की लावू नये,
तिने कसे जगले पाहिजे, तिने दुसरे लग्न करावे की करू नये?
Related News
अकोल्यात उन्हाचा तडाखा! तापमान ४४.२ अंशांवर, राज्यातील सर्वाधिक
माझोड – बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;
भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
‘सहकारातून समृद्धी’ योजनेतून सहकार चळवळीला नवे बळ – नानासाहेब हिंगणकर
सावता परिषदेच्या पातूर तालुका अध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड
आर्थिक विवंचनेत अडकलेल्या युवक शेतकऱ्याची आत्महत्या
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
आजही असंख्य प्रश्न, शंका, निबंध समाजाकडून एकल महिलांवर घातले जातात.
अशात सौभाग्यवती महिलांप्रमाणेच एकल महिलांनाही वटपौर्णिमेचा उत्सव साजरा करता यावा,
यासाठी अकोल्यातील श्री विकास फाउंडेशनच्या वतीने
सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.
मागील ८ वर्षांपासून एकल महिलांना उभारी देणारी परंपरा
अखंडपणे सुरू असून संस्थेच्या सदस्यांनी शुक्रवारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली.
गोरक्षण रोड दत्त मंदिर, दत्त कॉलनीतील एकल महिला एकत्र आल्या.
कुणाच्या पतीचे अपघातात निधन झाले, तर काहींचा घटस्फोट झाला.
काही महिलांच्या पतीने त्यांना सोडून दिले.
अशा महिलांचा हळदीकुंकू, महिलांच्या विशेष उत्सव प्रसंगी त्यांचा फारसा विचार होत नाही.
महिलांचे उत्सव म्हणजे, त्यानिमित्त एकत्र होऊन गुजगोष्टी करणे, एकमेकांचे सुख, दुःख वाटून घेण्याचे प्रयोजन.
भाव-भावनांचे आदान-प्रदान करण्याची एक व्यवस्थाच.
पण दुर्दैवाने आयुष्यात अचानक आलेल्या के संकटामुळे एकल महिला यातून वेगळ्या पडतात.
खरंतर त्यांना त्यांच्या भावना मोकळ्या करण्याचे व्यासपीठ हवे असते.
पुन्हा आयुष्य नव्याने जगण्यासाठी सर्वांनी त्यांना सांभाळून घेणे अपेक्षित असते.
हिच गोष्ट लक्षात घेऊन श्री विकास फाउंडेशनच्या विधवा, परितक्ता,
घटस्फोटिता महिलांसाठी वटपौर्णिमा उपक्रम सुरू केला.
सुरुवातीला समाजाकडून त्यांना विरोध झाला.
पण हळूहळू हा बदल परिसरात स्वीकारण्यात आला.
समजून घेणे आवश्यक
माझे पतीच्या निधनानंतर मी वटपौर्णिमा उत्सव साजरा केला.
माझ्याप्रमाणे इतर महिलांना तसे करता, यावे हाच उपक्रमाचा उद्देश होता.
एकल महिलांच्या समस्यांना समाजाने समजून घेण्याची गरज आहे.
त्यांना वेगळे न करता त्यांना सामावून घेणे आवश्यक आहे.
– वैष्णवी दातकर, अध्यक्ष, श्री विकास फाउंडेशन
Read also: https://ajinkyabharat.com/dont-ignore-mood-swings/