अकोला, दि. २३: मुर्तिजापूर शहरातील खडकपुरा परिसरात तलवारीने केक कापणाऱ्या युवकावर
पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. सध्या तरुणांमध्ये तलवारीने केक कापण्याचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे,
आणि समाजमाध्यमांवर याचे फोटो व व्हिडिओ टाकण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे.
Related News
नायब तहसीलदारांनी शेतातच भरवले न्यायालय; शेतकऱ्याला दिलासा
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
मुर्तिजापूर पोलिसांनी खडकपुरा येथील शेख शहबाज शेख अश्फाक (वय २४ वर्षे)
या युवकावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे या घटनेचा तपास केला असता,
शेख शहबाज याने तलवारीसह केक कापण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल:
सदर युवकाने तलवार बेकायदेशीररीत्या स्वतःजवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले.
यामुळे पोलिसांनी शेख शहबाजविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली.
तरुणांमध्ये असणाऱ्या फॅडला आळा घालण्याचा प्रयत्न:
तलवारीसारखी धोकादायक शस्त्रे वापरणे आणि ती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध
करणे हा गंभीर गुन्हा असून, यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी यापुढेही कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पोलिसांकडून जनतेसाठी आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
जर कोणालाही त्यांच्या परिसरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर शस्त्रांचा
वापर होत असल्याची माहिती मिळाली, तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
सदर कारवाईमुळे तरुणांमध्ये समाजमाध्यमांवर वादग्रस्त ट्रेंड पसरवण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल,
अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.