पाकव्याप्त काश्मिरातील लोकांच्या भावना
पाकव्याप्त काश्मिरातील बहुतांश लोकांनी भारतात सामील
होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने
पीओकेतील लोकांसोबत मोबाईलद्वारे संभाषण करून त्यांची मते
आजमावून घेतली. इन्शाअल्लाह… व्याप्त काश्मीरवर हिंदुस्थानची
हुकूमत येण्याची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करीत असल्याची भावना
सीमेपलीकडील लोकांनी व्यक्त केली, असा दावा या वृत्तवाहिनीने
केला आहे. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेला लागून असणाऱ्या
पाकिस्तानच्या कब्जातील व्याप्त काश्मिरातील काही गावांतील
लोकांचे मोबाईल घेऊन संबंधित वृत्तवाहिनीने मते आजमावली.
काश्मीरमधील लोकांना आता परिस्थितीचे भान आले आहे. कलम
३७० हटविल्यामुळे विकास होत असल्याची जाणीव मतदारांना
झाल्याची प्रतिक्रिया सीमेपलिकडून व्यक्तकरण्यात आल्या.
पीओकेमध्ये विधानसभेच्या २४ जागा
आहेत. या ठिकाणी भारत सरकारने ऑनलाईन मतदान घ्यावे,
अशी मागणीही करण्यात आली. जम्मू- काश्मीरमध्ये शांततेत
मतदान पार पडले आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा झालेली नाही.
त्यामुळे पीओकेतील जनमत भारतात सामील होण्याच्या बाजूने
वाढत चालले आहे, अशी माहिती पीओकेतील रहिवासी सज्जाद
रजा यांनी दिली. पीओकेतील दिरकूकचे सरपंच आकीब राजपूत
म्हणाले की, व्याप्त काश्मीरमध्ये महागाईने लोक त्रस्त झाले
आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विकास आणि रोजगार निर्माण होत
आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकप्रकारे पीओकेच्या भविष्याची
आहे. व्याप्त काश्मिरातील लोकांना अन्नधान्याच्या टंचाईचा
सामना करावा लागत आहे. पाक सरकारमुळे लोकांवर
उपासमारीची वेळ आली आहे. उलट जम्मू-काश्मीरमध्ये खऱ्या
अर्थाने लोकशाही दिसून येत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sambhajiraje-morcha-organized-against-shinde-government/