नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या योजनेचा लाभ वेळेत मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी
30 मेपूर्वी ई-केवायसी आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, यावेळेसचा हप्ता थांबू शकतो.
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं,
जे तीन समान हप्त्यांमध्ये थेट खात्यात जमा होतं. आतापर्यंत 19 हप्ते वितरित झाले असून आता 20व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे.
ई-केवायसीसाठी पर्याय :
-
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून स्वयं ई-केवायसी करा
-
PM-Kisan मोबाईल अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी
-
CSC सेंटरवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा
बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य :
जर बँक खात्याशी आधार लिंक नसेल, तर फसवणूक टाळण्यासाठी तुमचं नाव लाभार्थी
यादीतून वगळलं जाऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी.