बार्शीटाकळी प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील बायपास बस स्थानक प्रवासी निवारा स्थानिक
प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे,
यामुळे पिंजर येथील निवाऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून एक खांब कोसळलेला आहे,
तो कधी कोसळेल, यांची शाश्र्वती नाही, यामुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे,
हा प्रकार टाळण्याकरिता या समेस्येची दखल घेऊन येथे नवीन प्रवासी निवारा बांधावा,
अशी पिंजर येथील नागरिकांनी मागणी केली आहे, पिंजर बायपास परिसरातील नागरिकांकरिता महत्वाची आहे,
अकोला कारंजा या राज्य मार्गावर पिंजर गाव येते या गावावरून अकोला, कारंजा, अमरावती, तसेच समृद्धी महामार्ग जाण्याकरिता मार्ग आहे.
जवळ पास पिंजर गावाला 64 खेडेगाव जुळले आहे, गावातील प्रवासी निवाऱ्यावरून परिसरातील गावाकडे जाण्याकरिता
बस मिळते यामुळे 64 खेड्यावरील प्रवासी येथून ये-जा करतात येथील प्रवासी निवाऱ्यावर कायम वर्दळ असते
दररोज येथू 100 ते 200 हून विद्यार्थी या प्रवासी निवारात येतात परिवहन मंडळाला पिंजर येथून चांगलेच आर्थिक उत्पन्न प्राप्त होते,
परंतु येथे सुविधा देण्याकडे परिवहन मंडळाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रयत्य येथील नागरिकांना केला आहे,
पिंजर बायपास वरुण बार्शीटाकळी, अकोला, महान, कारंजा, मुर्तीजापुर, अमरावती,
येथे जाण्याकरिता बस गाड्या पिंजर बायपास वरिल प्रवासी निवाराच्या खाम कोसळल्यामुळे प्रवासी निवारा केव्हाही कोसळू शकेल अशा स्थितीत आहे,
तरीही त्याची साधी डागडुजी केली जात नाही, यासह येथे प्रवाशांना बसण्याची योग्य व्यवस्था नाही,
येथे दिवसाला अनेक प्रवासी येतात, प्रवासी निवाऱ्याची दयनीय अवस्था प्रवासाच्या जीवावर बेतनारी ठरू शकते,
विशेषत विद्यार्थी वयोवृद्ध या प्रवासी निवाऱ्यात थांबत असताना मोठी दुर्घटना होण्यापूर्वी येथील प्रवासी निवारा त्वरित बांधण्यात
यावा अशी ग्रामस्थ व प्रवाशाची मागणी आहे, संबंधित विभागाने लक्ष देत कारवाई करून प्रवासी, विद्यार्थी यांना दिलासा देण्याची मागणी आहे.