पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा

दानापूर : ( वा )

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना

मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे.

Related News

यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळा लवकर

येण्याची चाहूल लागली आहे. तसेच या पावसामुळे शेती मशागत करणे सोयी झाले आहे.

पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याने शेतकरी मिळेल त्या

अवजारांचा उपयोग करून किंवा यंत्राच्या, ट्रॅक्टर, बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी व वखरणीसाठी

शेतामध्ये लागलेले आहेत. दानापूरसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनीही शेतातील मशागत सुरू केली आहे.

शेती नवीन हंगामासाठी होत आहे सज्ज

दानापूर गावातील शेतकरी लोकांना उन्हाळी ज्वारी, भुईमूग, मुंग,मक्का, कांदा, पीक काढण्यात

अवकाळी पाऊस मोठ मोठी अडचण ठरला होता. या अस्मानी संकटामुळे कास्तकार हवालदिल झाला आहे.

पावसाळ्यातील पिके घेण्यासाठी शेतीच्या मशागती जोरात सुरू झाली आहे. हवामान विभागाने पुढील

काही दिवस पावसाचा खंड राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी बी-बियाणे

आणि खतांची तयारीही सुरू झाली आहे. शेतकरी आता नव्या हंगामासाठी सज्ज होत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/duchaki-disinterested-wife/

Related News