शून्य व्याजाने कर्ज द्यावे, त्या सक्षम होतील – पंकजा मुंडे
महिला फुकट पैसे घेणारच नाहीत. त्यांना कर्ज हवे आहे. त्यांना
कमीतकमी व्याजदराने किंवा शून्य व्याजाने कर्ज दिल्यास महिला
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
सक्षमपणे उभ्या राहतील. महिलांना केवळ शक्ती देऊन चालणार
नाही, तर त्यांना सन्मानही दिला पाहिजे, असे मत आमदार पंकजा
मुंडे यांनी व्यक्त केले. महायुती सरकारच्या लाडकी बहीण
योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचे हे विधान भुवया उंचावणारे ठरले
आहे. रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे आयोजित
‘धागा’ या स्वदेशी मेळ्याचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.
प्रदर्शनाच्या संयोजक व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा
कुलकर्णी, ‘द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे’
उपाध्यक्ष चारुदत्त देशपांडे, ‘ब्रिहन्स नॅचरल प्रॉडक्ट’च्या संचालक
शीतल आगाशे, ‘एमएसएमई’चे सहसंचालक मिलिंद बारापात्रे,
उपसंचालक अभय दफ्तरदार, माजी नगरसेवक दिलीप वेडे
पाटील, जयंत भावे आदी उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या,
कोणाकडून काही उधार घेतले, मदत घेतली, तरी महिला ती परत
करतातच. आम्ही ग्रामीण भागातील महिलांसाठी शून्य व्याजदराने
कर्ज योजना राबविली होती. ९९.७० टक्के महिलांनी कर्ज
नियमितपणे फेडले. अशी योजना शहरी बचत गटांसाठीही आणली
पाहिजे. यासाठी मी पाठपुरावा करेन. महिलांकडे गुणवत्ता असली,
तरी कुठल्याही क्षेत्रात झगडूनच त्यांना स्वतःला सिद्ध करावे
लागते. घरातील महिलेने काम करून उत्पन्न मिळवणे ही काळाची
गरज झाली आहे. एकाच्या उत्पन्नावर घर चालू शकत नाही.
ग्रामीण भाग असो वा शहरी, महिला घराची जबाबदारी सांभाळून
कामही करतात. मात्र, अशावेळी आपला अहंकार बाजूला ठेवून
महिलांना समान अधिकार का मिळत नाही, असा मला प्रश्न
पडतो, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. महिला उद्योजिकांना
प्रोत्साहन देऊन त्यांना व्यवसायवृद्धीसाठी व्यासपीठ देण्याच्या
उद्देशानेच हे प्रदर्शन आयोजिण्यात आल्याचे प्रा. डॉ. कुलकर्णी
यांनी सांगितले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.
Read also: https://ajinkyabharat.com/total-32-naxalites-eliminated-in-chhattisgarh/