अकोट: वारकरी संतांनी सुरू केलेल्या पंढरपूर वारीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे.
पंढरपूर वारी म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर, असे उद्बोधक विचार संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे सचिव
व प्रख्यात कीर्तनकार हभप रविंद्र वानखडे यांनी व्यक्त केले.
Related News
नायब तहसीलदारांनी शेतातच भरवले न्यायालय; शेतकऱ्याला दिलासा
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
विदर्भातील देहू कालवाडी येथे झालेल्या संत तुकाराम बीज सोहळ्यातील कीर्तनात ते बोलत होते.
वारी म्हणजे भक्तीचा प्रवाह
“पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थात ||
” या संत तुकोबारायांच्या अभंगाचा भावार्थ सांगताना ते म्हणाले की,
वारी करताना एकादशीचे व्रत आणि अखंड नामस्मरण हे वारकऱ्यांचे मुख्य आधारस्तंभ असतात.
विठुरायाचे नाव कल्पांतीचे बीज आहे, अवघ्या अस्तित्वाचे कारण आहे.
वारी म्हणजे भक्तीचा सोहळा, संस्कृतीचा वारसा आणि संतपरंपरेचा गौरव.
जसे सासरी गेलेली मुलगी माहेरी जाण्यासाठी आतुर असते,
तसेच वारकरी आपल्या मायबाप विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतो.
नाचत-गात, टाळ-मृदंगाच्या निनादात, रिंगण, फुगडी आणि भारुडे करीत भक्तीचा हा प्रवाह अखंड वाहत असतो.
ही परंपरा मराठी सांस्कृतिक वारशाचे अनमोल वैभव आहे, असा विचार त्यांनी मांडला.
श्रद्धासागर आणि कालवाडी तीर्थस्थळाचे स्मरण
दरम्यान, श्रद्धासागर व कालवाडी ही तीर्थस्थळे उभारणारे थोर व्यक्तिमत्व
वै. पंजाबराव हिंगणकर यांचे पुण्यस्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या हस्ते हभप
रविंद्र महाराज वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.