अकोट: वारकरी संतांनी सुरू केलेल्या पंढरपूर वारीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे.
पंढरपूर वारी म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर, असे उद्बोधक विचार संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे सचिव
व प्रख्यात कीर्तनकार हभप रविंद्र वानखडे यांनी व्यक्त केले.
Related News
बिग बॉस मराठी 6 : “मी तिला पटवणार” – विशालच्या रणनीतीमुळे बिग बॉसच्या घरात तणाव वाढला!
डिफेन्स शेअर्सने बाजारातील घसरणीला दिला उत्तर; काही स्टॉक्स 13% पर्यंत वाढले
T20 World Cup 2026: भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानवर 50 लाखांचा दंड ठोठावला!
अमेरिका-इस्रायलचा इराणवर प्रचंड हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांची भयंकर चेतावणी
रंगांच्या उत्सवात गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी 10 वॉटरप्रूफ उपाय
‘The 50’ : वादानंतर सिवेतने दिली वंशजसाठी भावनिक माफी; प्रेक्षकही झाले भावूक
EPFO 2025-26: नोकरदारांसाठी मोठी बातमी, पीएफवर 8.25% व्याजदर कायम!
अमेरिकेचे एफ-15 जेट इराणने नाही, तर कुवेतच्या चुकीमुळे पाडले गेले
मध्य-पूर्वेत तणाव उफाळला: अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष भयंकर स्वरूपात
इराण-यूएई युद्ध: जालना खासदार डॉ. कल्याण काळे दुबईत अडकले, सुरक्षिततेची माहिती मिळाली
विदर्भातील देहू कालवाडी येथे झालेल्या संत तुकाराम बीज सोहळ्यातील कीर्तनात ते बोलत होते.
वारी म्हणजे भक्तीचा प्रवाह
“पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थात ||
” या संत तुकोबारायांच्या अभंगाचा भावार्थ सांगताना ते म्हणाले की,
वारी करताना एकादशीचे व्रत आणि अखंड नामस्मरण हे वारकऱ्यांचे मुख्य आधारस्तंभ असतात.
विठुरायाचे नाव कल्पांतीचे बीज आहे, अवघ्या अस्तित्वाचे कारण आहे.
वारी म्हणजे भक्तीचा सोहळा, संस्कृतीचा वारसा आणि संतपरंपरेचा गौरव.
जसे सासरी गेलेली मुलगी माहेरी जाण्यासाठी आतुर असते,
तसेच वारकरी आपल्या मायबाप विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतो.
नाचत-गात, टाळ-मृदंगाच्या निनादात, रिंगण, फुगडी आणि भारुडे करीत भक्तीचा हा प्रवाह अखंड वाहत असतो.
ही परंपरा मराठी सांस्कृतिक वारशाचे अनमोल वैभव आहे, असा विचार त्यांनी मांडला.
श्रद्धासागर आणि कालवाडी तीर्थस्थळाचे स्मरण
दरम्यान, श्रद्धासागर व कालवाडी ही तीर्थस्थळे उभारणारे थोर व्यक्तिमत्व
वै. पंजाबराव हिंगणकर यांचे पुण्यस्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या हस्ते हभप
रविंद्र महाराज वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
