नवी दिल्ली | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली असून,
त्याचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसू लागला आहे.
Related News
कुंभारी एक छोटसं गाव फार तर तिथे जायला अकोल्यावरूनदहा मिनिट लागतील.
एक जुलै 1977 रोजी एका तुकाराम बिडकर नावाच्या ध्येय वेड्या व्यक्तीने जय बजरंग व्यायाम शाळेची स्थापना केली.
...
Continue reading
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची बैठक मुर्तीजापुर येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठ...
Continue reading
अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध १७ मागण्यासाठी प्रहार जनशक्ती
पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन ...
Continue reading
राज्य सरकारने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जून ते ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या संभाव्य वाहतूक अडचणींचा विचा...
Continue reading
प्रतिनिधी | अहमदाबाद
अहमदाबादमध्ये शनिवारी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातावर केंद्र सरकारकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदे...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) २०वा हप्ता लवकरच म्हणजे २० जून २०२५ रोजी पात्र
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिले...
Continue reading
समधितांचे अर्थपूर्ण दूर लक्ष
माल वाहतूक दारावर उपास मारीची पाळी
सध्या संपूर्ण भारतात घरकुल योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गावोगावी घरकुल मंजूर झाले
आणि नुकतीच पाऊसल्याला स...
Continue reading
अकोट शहर प्रतिनिधी... राजकुमार वानखडे ..
अकोट तालुक्यातील प्रसिद्ध असलेले संत नगरी मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे या नावाने प्रसिद्ध असलेला
आठवडी बाजार मध्ये घाणीचे साम्राज्य पस...
Continue reading
अकोल्यात प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रोड सेफ्टी व्हिजन या वाहनाद्वारे वाहतूक नियमांबाबत अकोला
शहरात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहेय.. शहरातील रस्त्यावर चलचित्रद्वारे वाहन
...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,शेत शिवारात गुरुवारी दुपार
नंतर आलेल्या वादळी वारा,पाऊस,व गारपीटीने बोर्डी सह आज...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
काही क्षणांत संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.मात्र अशा कठीण प्रसंगी धैर्य,मायेची
उब आणि देवाची कृपा लाभली,तर चमत्कारही शक्य होतो याचे प्रत्यंतर नुकत्याच...
Continue reading
अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापुर मार्गावरील हेरिटेज हॉटेलमध्ये लग्नसमारंभ पर्ससह
2 लाख 43 सोन्याचे दाग दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी सम...
Continue reading
भारताने सिंधू जल करार आणि व्यापार संबंध थांबवण्यास सुरुवात केल्यानंतर, पाकिस्तानने
भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. मात्र यामुळे उलट पाकिस्तानलाच मोठा आर्थिक फटका बसत आहे.
पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाणावर निर्बंध घालण्यात आल्याने भारतीय विमान कंपन्यांना अरब
देशांपर्यंत पोहोचण्यास अधिक वेळ लागत आहे, त्यामुळे इंधनाचा खर्चही वाढला आहे.
दुसरीकडे, लुफ्थांसा, ब्रिटिश एअरवेज, एअर फ्रान्स, स्विस, आयटीए (इटली),
पोलंडची एलओटी यांसारख्या अनेक प्रमुख युरोपीय विमान कंपन्यांनी स्वेच्छेने पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळण्याचा निर्णय घेतला आहे,
जो पाकिस्तानसाठी आणखी मोठा आर्थिक धक्का आहे.
पाकिस्तानला लाखो डॉलर्सचे नुकसान
पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाला दरमहा हवाई मार्गाचा वापर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांकडून ओव्हरफ्लाइट शुल्क मिळते.
मात्र, युरोपीय कंपन्यांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर बंद केल्यामुळे दरमहा लाखो डॉलर्सचे नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे.
एअर इंडियालाही मोठा फटका
एअर इंडियाला दरवर्षी 600 दशलक्ष डॉलर (सुमारे ₹5,000 कोटी) इतका आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवाई क्षेत्र टाळण्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढतो, इंधनाचा अतिरिक्त वापर होतो आणि नियोजनात अडचणी येतात.
CAPA (Centre for Asia-Pacific Aviation) ने दिलेल्या अंदाजानुसार,
भारतीय विमान कंपन्यांना दरमहा 70 ते 80 दशलक्ष डॉलरचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
पूर्वीही झाला होता आर्थिक फटका
फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट येथील दहशतवादी तळांवर भारताने हवाई हल्ला केल्यानंतरही पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केले होते.
त्या काळात पाकिस्तानला केवळ पाच महिन्यांत 100 दशलक्ष डॉलरचे नुकसान सहन करावे लागले होते.
भारताची ठाम भूमिका आणि परिणाम
भारताकडून घेतल्या जाणाऱ्या कठोर भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकाकी पडताना दिसत आहे.
याचे दुष्परिणाम केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिक पातळीवरही मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/sambhache-co-anuj-chaudhary-yanchi-changed/