एमपीएससीच्या कारभारावर आदित्य ठाकरेंची टीका
पुण्यातील नवी पेठेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
25 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. राज्यसेवा आयोग
Related News
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
आणि आयबीपीएसचा परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख
बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात
समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
अखेर यावर एमपीएससी आयोगाने निर्णय घेतला. ही परीक्षा पुढे ढकल्याणात
आली आहे. या पेपरची पुढची तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकमध्ये बोलताना त्यांनी एमपीएससी आयोगाच्या कारभारावर त्यांनी टीका केली आहे.
वारंवार एमपीएससी आयोगाकडून चुकीची पाऊले का उचलली जातात?
वारंवार विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी का थांबतात? आम्ही या आंदोलनाला
पाठींबा दिलाय. राष्ट्रवादीने, काँग्रेसने सर्वांनी पाठींबा दिलाय. कारण हा
तरुणांचा विषय आहे. त्यांच्या भविष्याचा विषय आहे. एकतर महाराष्ट्रमध्ये
रोजगार उपलब्ध होत नाही. नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. त्यात स्पर्धा परीक्षांचा
हा घोळ आहे. किती वेळा मुलं आंदोलन करणार? बेसिक प्लॅनिंग एमपीएससीने करावं.
अन्यथा एमपीएससी आयोगवाल्यांनी राजीनामा द्यावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/badlapur-atrocities-case-high-court-hears-governments-hearing/