मुंबई | ८ मे २०२५ – भारतीय लष्कराने अंमलात आणलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर
देशभरात सुरक्षेचा उच्चतम अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यामुळे देशातील उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील एकूण २७ नागरी विमानतळे
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
१० मे रोजी सकाळी ५.२९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
याचा थेट परिणाम देशातील हवाई वाहतुकीवर झाला असून, हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
त्याचबरोबर, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील आज ६
तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,
आज (८ मे) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रनवे देखभालीसाठी बंद राहणार आहे.
या वेळेत कोणतीही उड्डाण किंवा आगमन प्रक्रिया होणार नाही.
हवाई सेवा विस्कळीत:
-
७,४३० उड्डाणे रद्द, ज्यात फक्त आजच ४३० भारतीय विमानसेवा आणि १४७ पाकिस्तानी उड्डाणांचा समावेश.
-
काश्मीर ते गुजरात दरम्यानच्या पश्चिम हवाई क्षेत्रात नागरी उड्डाणे थांबलेली.
-
विदेशी विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळून मुंबई-अहमदाबाद मार्ग निवडला.
-
भारतात इस्लामाबादकडे जाणाऱ्या काही विमानांनी “यू-टर्न” घेतल्याचं फ्लाइट रडार डेटावरून दिसले.
बंद राहणारी प्रमुख विमानतळे:
श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, पठाणकोट, जोधपूर, भुज, राजकोट, पोरबंदर, ग्वाल्हेर,
हिंडन यांसारखी अनेक महत्त्वाची विमानतळे फक्त लष्करी अथवा आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत राहतील.
सामान्य नागरी आणि चार्टर्ड उड्डाणे पूर्णतः थांबवण्यात आली आहेत.
या पार्श्वभूमीवर, प्रवाशांनी आपापल्या विमानसेवेच्या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट
तपासावेत आणि जिथे असाल तिथेच सुरक्षित राहा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mumbaikrancha-migration-mahagala/