नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्यासाठी
खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट)
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
प्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्यात थेट फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारकडून नेमलेले खासदारांचे हे गट विविध राष्ट्रांना भेट देऊन भारताच्या ऑपरेशन
सिंदूरमधील भूमिकेचे स्पष्टीकरण देणार आहेत. या शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश करण्यात आला असून,
शिवसेनेने या पुढाकाराचे स्वागत करत दहशतवादाविरोधातील लढ्यात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्र सरकारला दिले आहे.
शिष्टमंडळ हा कोणत्याही राजकीय हेतूने नसून, केवळ राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केल्यानंतर,
उद्धव ठाकरे यांनी “आपण देशासाठी आवश्यक ते सहकार्य करू,” असे केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.
शिवसेना (ठाकरे गट) यांची भूमिका स्पष्ट करताना असेही सांगण्यात आले की,
“देशात गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न विचारले जातील,
पण जागतिक स्तरावर पाकिस्तानमधील दहशतवादाचे वास्तव उघड करणे, त्याला एकटे पाडणे आणि नष्ट करणे आवश्यक आहे.”
शिवसेनेने यावेळी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर या
विषयावर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली.
तसेच अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळांबाबत सर्व राजकीय पक्षांना सविस्तर माहिती देण्यात यावी,
अशी सूचना देखील करण्यात आली.
भारत सरकारचा उद्देश —
खासदारांच्या माध्यमातून विविध देशांमध्ये जाऊन भारताच्या दहशतवादाविरोधातील स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडणे,
आणि जागतिक सहमती मिळवून पाकिस्तानस्थित दहशतवादाचा बंदोबस्त करणे हा असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pooja-meshram-yanani-international-level-akolyacha-jhanda-fadkavala/