नवी दिल्ली | प्रतिनिधी
२२ एप्रिल रोजी पल्लनगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी
तळांवर निर्णायक हवाई कारवाई केली. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं असून,
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हे नाव निश्चित केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
‘सिंदूर’ हे नाव फक्त वैवाहिक स्त्रियांच्या मांगातील सौभाग्याचं प्रतीक नाही,
तर त्या स्त्रिया ज्या या हल्ल्यामुळे विधवा झाल्या – त्यांचा सन्मान, आणि त्यांच्या अश्रूंना दिलेला न्याय
असाही संदेश हे नाव देते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले,
ज्यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे मुख्य अड्डे होते.
या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. लेफ्टनंट विनय नारवाल यांच्या नवविवाहित पत्नी
हिमांशी आणि पर्यटक पल्लवी रावच्या व्हायरल झालेल्या दृश्यांनी देशाच्या भावना हलवल्या.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे त्या आणि इतर विधवा महिलांना काही प्रमाणात न्याय मिळाला आहे, असं अनेक पीडित कुटुंबांनी म्हटलं आहे.
भारतीय लष्कराने जाहीर केलेल्या पोस्टरमध्ये ‘Operation Sindoor’ हे नाव ठळक अक्षरात असून,
त्यातील ‘O’ सिंदूराच्या वाटीसारखं दाखवण्यात आलं आहे. खाली मजकूर आहे – “Justice is served. जय हिंद.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पल्लनगाम हल्ला म्हणजे भारताच्या आत्म्यावर झालेला आघात आहे.
देश शत्रूंच्या कोणत्याही कारवायेला गप्प बसणार नाही. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना शिक्षा होणारच.”
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-ankhi-kharchi-persity/