भारताचा निर्णायक प्रतिहल्ला; इस्लामाबाद, लाहोर, कराचीवर क्षेपणास्त्रांचा मारा
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरापतींना आता भारताने कडक प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. लाहोरवर यशस्वी हल्ल्यानंतर आता थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर क्षेपणास्त्रांद्वारे निशाणा साधण्यात आला आहे.
भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये सायरनचा आवाज घुमू लागला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
Related News
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
मान्सूनची चाहूल! राज्यात प्री-मान्सूनची जोरदार हजेरी,
PM Kisan 20वा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी 30 मे पूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्त्वाचे काम
पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार?
उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;
पाकिस्तानकडून नागरी भागांवर हल्ला, भारताचं तातडीनं प्रत्युत्तर
पाकिस्तानने भारताच्या नागरी भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने तो हल्ला अयशस्वी ठरवला. त्यानंतर भारताने लाहोरवर हल्ला करून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर कराची, सियालकोट आणि आता इस्लामाबादवरही निशाणा साधण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये अंधाराचे साम्राज्य
भारतीय हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. इस्लामाबाद, लाहोर, कराचीसह पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर्णपणे अंधार पसरला आहे. या ब्लॅकआऊटनं पाकिस्तानची प्रसारण व्यवस्था, संचार आणि प्रशासन यावर मोठा परिणाम झाल्याचं सूत्रांकडू समस्त आहे.