ऑपरेशन सिंदूर : लाहोरनंतर इस्लामाबादवर हल्ला,

ऑपरेशन सिंदूर : लाहोरनंतर इस्लामाबादवर हल्ला,

भारताचा निर्णायक प्रतिहल्ला; इस्लामाबाद, लाहोर, कराचीवर क्षेपणास्त्रांचा मारा

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरापतींना आता भारताने कडक प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. लाहोरवर यशस्वी हल्ल्यानंतर आता थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर क्षेपणास्त्रांद्वारे निशाणा साधण्यात आला आहे.

भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये सायरनचा आवाज घुमू लागला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Related News

पाकिस्तानकडून नागरी भागांवर हल्ला, भारताचं तातडीनं प्रत्युत्तर

पाकिस्तानने भारताच्या नागरी भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने तो हल्ला अयशस्वी ठरवला. त्यानंतर भारताने लाहोरवर हल्ला करून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर कराची, सियालकोट आणि आता इस्लामाबादवरही निशाणा साधण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये अंधाराचे साम्राज्य

भारतीय हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. इस्लामाबाद, लाहोर, कराचीसह पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर्णपणे अंधार पसरला आहे. या ब्लॅकआऊटनं पाकिस्तानची प्रसारण व्यवस्था, संचार आणि प्रशासन यावर मोठा परिणाम झाल्याचं सूत्रांकडू समस्त आहे.

Related News