“हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मराठी भाषेला स्थान दिलं,
शब्दकोष तयार केला तिथे भय्याजी जोशींच हे वक्तव्य म्हणजे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे.
अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी भय्याजी जोशी आणि आरएसएसच्या भूमिकेचा धिक्कार केला पाहिजे”
Related News
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
Kattalan Review : स्टाईल आणि अॅक्शनचा तडका, पण कथेत भावनिक खोलीचा अभाव
Kattalan Review : ‘मार्को’सारख्या प्रचंड चर्चेत राहिलेल्या आणि यशस्वी...
Continue reading
अबूधाबीमध्ये हिजाब परिधान केल्याने अंकिता लोखंडे ट्रोल; सोशल मीडियावर धर्मांतराच्या चर्चांना उधाण
अबूधाबीती...
Continue reading
iPhone 18 Pro लॉन्चपूर्वी मोठी लीक! ‘डार्क चेरी’ आणि ‘स्काय ब्लू’ रंगांची चर्चा; Apple पुन्हा बदलणार डिझाइन?
Appleच्या आगामी iPhone 18 Pro मालिक...
Continue reading
Twisha Sharma च्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! 20 लाखांचे शेअर्स, CCTV लॉग्स आणि शेवटच्या 40 मिनिटांचा तपास; CBIच्या रडारवर संपूर्ण कुटुंब
अभिनेत्री आणि मॉडेल
Continue reading
मानसशास्त्राचा दावा! ज्यांचे जवळचे मित्र नसतात, त्यांच्यात लपलेली असते ही एक सवय; तुम्हीही असे आहात का?
मानसशास्त्राचा दावा! जवळचे मित्र नसलेल्या लोकांमध्ये असते ही एक सवय : प्रत्...
Continue reading
असं संजय राऊत म्हणाले.“महाराष्ट्रात कालपासून दोन विषय चर्चेत आहेत. अस्वस्थ करणारे आहेत.
पहिला विषय भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी हे काल मुंबईत आले.
त्यांनी जाहीर केलं की, मुंबईची भाषा मराठी नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे.
मराठी मीडियाने कसं दुर्लक्ष केलं याकडे? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का?
भाजपचे प्रमुख नेते मुंबईत येऊन सांगतात, मुंबईची भाषा मराठी नाही,
राज्याच्या मुख्यमंत्र्याने हे सहन करावं” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“भय्याजी जोशी अस म्हणतात की, मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो.
कारण मुंबईला कोणतीच भाषा नाही. त्यांचं म्हणण आहे की, घाटकोपरची भाषा गुजराती आहे.
ते तामिळनाडूत जाऊन चेन्नईत असं बोलू शकतात का?. बंगळुरु, लुधियानाला, पाटण्याला, लखनऊला जाऊन हे बोलू शकतात का?
महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन सांगतात मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे अन्य आहे. मराठी येण्याची गरज नाही,
मराठी आमची राजभाषा आहे. राजभाषा असेल तर अशा प्रकारच वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे” असं संजय राऊत म्हणाले.
हे ऐकण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं का?
“106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी मराठी भाषेसाठी बलिदान दिलं,
ते हे ऐकण्यासाठी का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“सध्याच्या सरकारला थोडा जरी स्वाभिमान, मराठी भाषेचा अभिमान आहे का?
राज्य गौरव गीत गाता, त्याचा शो करता. तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता,
तिथे भाषण करता आणि या मुंबईत येऊन तुमच्या
पक्षाचे प्रमुख नेते, विचारधारा वाहक
मुंबईची भाषा मराठी नाही सांगतात हा अपमान नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
‘हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य’
“भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. ठराव मजूर केला पाहिजे.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे मिधें सत्तेत बसले आहेत, कुठे आहेत ते?
. माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी, भाषेसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं.
जे आज विचारवाहक बसले आहेत, त्यांनी हिम्मत असेल तर भय्याची जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा” असं संजय राऊत म्हणाले.
…नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्यालेले नाहीत
“भय्याजी जोशींसंदर्भात महाराष्ट्र विधानसभेत राज्य सरकारने निंदा ठराव आणून धिक्कार करावा,
नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्यालेले नाहीत. तुमच्या दूधात भेसळ आहे. तुमच्या जन्मात भेसळ आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सहन करणार नाही. कालपासून आमचं रक्त खवळलय” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/