“हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मराठी भाषेला स्थान दिलं,
शब्दकोष तयार केला तिथे भय्याजी जोशींच हे वक्तव्य म्हणजे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे.
अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी भय्याजी जोशी आणि आरएसएसच्या भूमिकेचा धिक्कार केला पाहिजे”
Related News
जय श्रीराम जय गोमाता .🚩🚩
काल दिनांक 05/07/2025 रोजी
गोपनीय माहितीनुसार सांगळूद येथून बार्शीटाकळी
ला 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात
असताना गौरक्षक दलाच्या गौरक्षक...
Continue reading
देऊन तिरोडा-आकोट या चालत्या एसटी बसमधून वाहकाने खाली उतरून दिले
अकोट
अशी गंभीर घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली तिरोडा आगाराची बस अकोटला साडेसात आठ वाजेच्या दरम्यान पोहोचते व ...
Continue reading
अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील इंटरनॅशनल
स्कूल ऑफ एंटीग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये
आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांची
दिंडी काढण्यात आली.
यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्याने
...
Continue reading
अकोला – अकोला शहरातील ३२० वर्षे जुने श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मंगलमय वातावरणात महापूजा संपन्न झाली. मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्वस...
Continue reading
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष
गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेविरोधात एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने
...
Continue reading
पातूर : तालुक्यातील ग्रामपंचायत बोडखा (चिंचखेड) मध्ये १५ वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करून
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हाप्रमुख डॉ.राज बोरकर यांनी केला आह...
Continue reading
अकोला शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी अकोल्यात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
विश...
Continue reading
अकोट शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
केवळ “मुलाकडे आई अधिक लक्ष देते” या कारणावरून एका ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा निर्दय खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समो...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
असं संजय राऊत म्हणाले.“महाराष्ट्रात कालपासून दोन विषय चर्चेत आहेत. अस्वस्थ करणारे आहेत.
पहिला विषय भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी हे काल मुंबईत आले.
त्यांनी जाहीर केलं की, मुंबईची भाषा मराठी नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे.
मराठी मीडियाने कसं दुर्लक्ष केलं याकडे? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का?
भाजपचे प्रमुख नेते मुंबईत येऊन सांगतात, मुंबईची भाषा मराठी नाही,
राज्याच्या मुख्यमंत्र्याने हे सहन करावं” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“भय्याजी जोशी अस म्हणतात की, मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो.
कारण मुंबईला कोणतीच भाषा नाही. त्यांचं म्हणण आहे की, घाटकोपरची भाषा गुजराती आहे.
ते तामिळनाडूत जाऊन चेन्नईत असं बोलू शकतात का?. बंगळुरु, लुधियानाला, पाटण्याला, लखनऊला जाऊन हे बोलू शकतात का?
महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन सांगतात मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे अन्य आहे. मराठी येण्याची गरज नाही,
मराठी आमची राजभाषा आहे. राजभाषा असेल तर अशा प्रकारच वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे” असं संजय राऊत म्हणाले.
हे ऐकण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं का?
“106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी मराठी भाषेसाठी बलिदान दिलं,
ते हे ऐकण्यासाठी का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“सध्याच्या सरकारला थोडा जरी स्वाभिमान, मराठी भाषेचा अभिमान आहे का?
राज्य गौरव गीत गाता, त्याचा शो करता. तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता,
तिथे भाषण करता आणि या मुंबईत येऊन तुमच्या
पक्षाचे प्रमुख नेते, विचारधारा वाहक
मुंबईची भाषा मराठी नाही सांगतात हा अपमान नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
‘हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य’
“भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. ठराव मजूर केला पाहिजे.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे मिधें सत्तेत बसले आहेत, कुठे आहेत ते?
. माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी, भाषेसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं.
जे आज विचारवाहक बसले आहेत, त्यांनी हिम्मत असेल तर भय्याची जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा” असं संजय राऊत म्हणाले.
…नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्यालेले नाहीत
“भय्याजी जोशींसंदर्भात महाराष्ट्र विधानसभेत राज्य सरकारने निंदा ठराव आणून धिक्कार करावा,
नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्यालेले नाहीत. तुमच्या दूधात भेसळ आहे. तुमच्या जन्मात भेसळ आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सहन करणार नाही. कालपासून आमचं रक्त खवळलय” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/