“हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मराठी भाषेला स्थान दिलं,
शब्दकोष तयार केला तिथे भय्याजी जोशींच हे वक्तव्य म्हणजे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे.
अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी भय्याजी जोशी आणि आरएसएसच्या भूमिकेचा धिक्कार केला पाहिजे”
Related News
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या
Continue reading
Apple-OpenAI वादात इलॉन मस्क यांची एन्ट्री; सॅम ऑल्टमनवर जहरी टीका, टेक विश्वात खळबळ
मुंबई : जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात पुन्हा एकदा मोठ...
Continue reading
व्हायरल वैदूच्या व्हिडिओंवर अभिनेता गिरीश परदेशी यांनी स्पष्ट भूमिका घेत लहान मुलांच्या संस्कार, सोशल मीडिया प्रसिद्धी आणि पालकांच्या जबाबदारीवर भ...
Continue reading
गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 10 किलोच्या नव्या LPG सिलिंडरची तयारी; छोट्या व्यावसायिकांसह लाखो ग्राहकांना होणार फायदा
देशभरात एलपीजी गॅसचा वापर सातत्याने वाढत असून घरग...
Continue reading
2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; 'सर्व कल्पना शरद पवारांना होती, पण दुसऱ्या दिवशी...'
राज्याच्या राजकारणात 2019 मधील पहा...
Continue reading
पावसाळ्यात कुरकुरीत बटाटा-कांदा भजी बनवायची आहेत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा; प्रत्येकवेळी मिळेल परफेक्ट चव
पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि त्यासोबत कुरकुरीत भजी खाण्याचा मोह...
Continue reading
'देवदास'साठी ऐश्वर्या राय की माधुरी दीक्षित... कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन? 24 वर्षांनंतर समोर आली रंजक माहिती
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' ह...
Continue reading
इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे TU-214PU विमान तेहरानमध्ये; मदतीच्या चर्चांना उधाण, मात्र अधिकृत सहभाग स्पष्ट नाही
मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्...
Continue reading
RBI क्रिप्टोवर बंदीच्या भूमिकेवर कायम; भारतात 3.9 कोटी गुंतवणूकदार, तरीही नियमांवर अनिश्चितता
भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असली, तरी रिझर्...
Continue reading
कढी वारंवार फाटते? मग स्वयंपाक करताना 'या' 5 चुका टाळा; प्रत्येक वेळी बनेल घट्ट, मऊ आणि स्वादिष्ट कढी
कढी हा भारतीय स्वयंपाकातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. गरमागरम वा...
Continue reading
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीत मोदी सरकार, 'विश्वगुरू' संकल्पना, शिक्षण व्यवस्था आणि राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवह...
Continue reading
एअर फ्रायरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखे टेस्टी कबाब! कमी तेलात तयार होतील 'हे' 6 स्वादिष्ट प्रकार
कबाब म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी असो ...
Continue reading
असं संजय राऊत म्हणाले.“महाराष्ट्रात कालपासून दोन विषय चर्चेत आहेत. अस्वस्थ करणारे आहेत.
पहिला विषय भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी हे काल मुंबईत आले.
त्यांनी जाहीर केलं की, मुंबईची भाषा मराठी नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे.
मराठी मीडियाने कसं दुर्लक्ष केलं याकडे? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का?
भाजपचे प्रमुख नेते मुंबईत येऊन सांगतात, मुंबईची भाषा मराठी नाही,
राज्याच्या मुख्यमंत्र्याने हे सहन करावं” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“भय्याजी जोशी अस म्हणतात की, मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो.
कारण मुंबईला कोणतीच भाषा नाही. त्यांचं म्हणण आहे की, घाटकोपरची भाषा गुजराती आहे.
ते तामिळनाडूत जाऊन चेन्नईत असं बोलू शकतात का?. बंगळुरु, लुधियानाला, पाटण्याला, लखनऊला जाऊन हे बोलू शकतात का?
महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन सांगतात मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे अन्य आहे. मराठी येण्याची गरज नाही,
मराठी आमची राजभाषा आहे. राजभाषा असेल तर अशा प्रकारच वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे” असं संजय राऊत म्हणाले.
हे ऐकण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं का?
“106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी मराठी भाषेसाठी बलिदान दिलं,
ते हे ऐकण्यासाठी का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“सध्याच्या सरकारला थोडा जरी स्वाभिमान, मराठी भाषेचा अभिमान आहे का?
राज्य गौरव गीत गाता, त्याचा शो करता. तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता,
तिथे भाषण करता आणि या मुंबईत येऊन तुमच्या
पक्षाचे प्रमुख नेते, विचारधारा वाहक
मुंबईची भाषा मराठी नाही सांगतात हा अपमान नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
‘हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य’
“भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. ठराव मजूर केला पाहिजे.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे मिधें सत्तेत बसले आहेत, कुठे आहेत ते?
. माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी, भाषेसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं.
जे आज विचारवाहक बसले आहेत, त्यांनी हिम्मत असेल तर भय्याची जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा” असं संजय राऊत म्हणाले.
…नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्यालेले नाहीत
“भय्याजी जोशींसंदर्भात महाराष्ट्र विधानसभेत राज्य सरकारने निंदा ठराव आणून धिक्कार करावा,
नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्यालेले नाहीत. तुमच्या दूधात भेसळ आहे. तुमच्या जन्मात भेसळ आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सहन करणार नाही. कालपासून आमचं रक्त खवळलय” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/