मूर्तिजापूर प्रतिनिधी – ग्रामीण भागातील वीज ग्राहकांवर होणारा अन्याय थांबवावा आणि त्यांचे
वीजबिल तातडीने निम्मे करावे, अशी ठाम मागणी रंभापूर गट ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशांत इंगळे यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ही मागणी त्यांनी मूर्तिजापूरचे उपकार्यकारी अभियंता अभय कदम यांच्या माध्यमातून लेखी निवेदनाद्वारे केली.
Related News
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समित्यांची बैठक
प्रशांत इंगळे यांनी पत्रात नमूद केले की, ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर त्याचे दुरुस्ती कार्य वेळेत होत नाही.
महावितरणचे कर्मचारी कामात टाळाटाळ करतात, त्यामुळे नागरिकांना दीर्घ काळ अंधारात राहावे लागते.
यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे.वीजबिल
यासोबतच ग्रामीण भागातील वीज पोल पूर्णपणे मोडकळीस आलेले असून, त्यांची तातडीने दुरुस्ती करावी,
अशी मागणीही करण्यात आली आहे. महावितरणकडून ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळत नसल्याचा आरोप करत,
प्रशांत इंगळे यांनी या समस्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.