मुंबईकरांचा प्रवास महागला!

मुंबईकरांचा प्रवास महागला!

मुंबई | ८ मे २०२५ – मुंबईतील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) या उपक्रमाने बस प्रवासाच्या तिकीट दरात दुप्पट वाढ जाहीर केली असून,

९ मे २०२५ पासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

Related News

बेस्टच्या आर्थिक डबघाईमुळे हे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र यामुळे आधीच महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या सामान्य मुंबईकरांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे.

बदललेली भाडे रचना आणि मुख्य मुद्दे:

  • विना वातानुकूलित बससाठी किमान भाडे ₹५ वरून ₹१० झाले.

  • वातानुकूलित बससाठी किमान भाडे ₹६ वरून ₹१२ करण्यात आले.

  • नवीन भाडेतप्पे ५ ते ५० किमी व त्यानंतर प्रत्येक ५ किमी अंतरासाठी निश्चित.

  • दैनंदिन बसपास ₹६० वरून ₹७५ आणि मासिक पास ₹९०० वरून ₹१८०० इतका महाग.

  • ५ ते १२ वयोगटातील मुलांना आता सवलतीच्या दराने प्रवास करता येणार.

  • शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या पास दरात कोणताही बदल नाही.

  • महापालिका शाळांतील गणवेषधारी विद्यार्थ्यांना चालू पद्धतीप्रमाणे मोफत प्रवास सुविधा सुरु राहणार.

मुंबईत बेस्ट ही स्वस्त आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक म्हणून ओळखली जाते.

अनेक नागरिक खासगी वाहतूक टाळून बेस्टचा उपयोग करत असतात.

मात्र, दरवाढीमुळे गरिब, कामगार आणि विद्यार्थी वर्गाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/or-god-save-today-pakistanchasa-sansadet-khasdaracha-emotional-impulse/

Related News