मुंबईत वाढत्या उष्णतेमुळे आणि कमी झालेल्या पाऊस पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे.
मुंबई महापालिकेने पाणी जपण्याचे आवाहन केले आहे आणि पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे.
उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने ही समस्या आणखी चिंताजनक होऊ शकते.
Related News
नवी दिल्ली | २१ मे २०२५ — पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानं राबवलेलं
ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं असून, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
हवाई आ...
Continue reading
नवी दिल्ली | २० मे २०२५ — केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ वर देशभरातून वाढता विरोध दिसून येत असून,
विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी स...
Continue reading
नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्या...
Continue reading
क्वालालंपूर, मलेशिया | १७ मे २०२५ — महाराष्ट्रातील अकोला या छोट्याशा शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेत,
पूजा मेश्राम यांनी अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.
मल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची ...
Continue reading
बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ
मिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मा
सिंदू...
Continue reading
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
मुंबईत गेल्या काही दिवसापासून उन्हाचा ताप वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाची काहिली होत आहे.
तर दुसरीकडे कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे.
मार्च सुरू होण्याआधीच पाणीसाठा अर्ध्यावर आल्याने मुंबई महापालिकेने मुंबईकरांना
पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. पाऊस जूनमध्ये सुरू होत असला तरी साधारण पावसाचे आगमन
जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये होत असते. त्यामुळे तोपर्यंत पाणीसाठी
पुरावा म्हणून महापालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे.
पाणी टंचाईची शक्यता ओळखून येत्या काळात महापालिका पाणी कपात करण्याचेही संकेत मिळत आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडकसागर,
भातसा, तानसा, तुळशी आणि विहार या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर
पाणीपुरवठा केला जातो, मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 343
दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत थंडी असते, मात्र यंदा फेब्रुवारी
महिन्यातच उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढते.
त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. आताच हा पाणीसाठा
अर्ध्यावर आल्याने महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
23 फेब्रुवारीला जलसाठा उपलब्ध (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा – 1,63,299
मोडकसागर – 25,316
तानसा – 63,612
मध्य वैतरणा – 98,803
भातसा – 3,75,432
विहार – 16,438
तुळशी – 4,535
उद्यापासून तापमान वाढणार
दरम्यान, मुंबईत काही दिवसांपासून उन्हाचा ताप जाणवू लागला असून मंगळवारपर्यंत मुंबईचे तापमान
आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांताक्रूझ येथे कमाल तापमान रविवारी 37.2 अंश
सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तापमानातील वाढीबरोबरच वाढत्या आर्द्रतेमुळे उष्मा अधिक प्रमाणात जाणवेल,
असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी 35 अंश सेल्सिअस,
तर सांताक्रूझ केंद्रात 37.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/na-boni-na-mithun-or-superstarsathi-sridevine-paavala-is-4-days-fast/