अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात विषबाधेमुळे 50 हून अधिक शेळ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेळीपालनावर उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, नुकसानग्रस्तांनी तातडीने शासनाकडून मदतीची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरशेवडी शेतशिवाराकडे जाणाऱ्या मार्गावरील फाटकाची शेवडी परिसरात शेळ्या चारत असताना अचानक त्यांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. शेळ्या चारणाऱ्या ढोरकी यांनी तातडीने परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने काही शेळ्यांना हिवरखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले. मात्र, अनेक शेळ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अबोली कथे आणि कर्मचारी राजेश वायकर यांनी विषबाधाग्रस्त शेळ्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या वेळी बजरंग तिडके, अन्सार खान, संतोष पटोळे, अर्जुन खिरोडकर, प्रणव इंगळे, संतोष मानकर, आबिद खान, दत्तू धुरदेव आणि राजेश राजनकार यांनी मदत केली. मात्र, मोठ्या प्रमाणावर विषबाधा झाल्याने अनेक शेळ्यांना वाचविणे शक्य झाले नाही.
Related News
चतारी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सडलेले पक्षी, मांसाचे तुकडे आणि हाडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये स...
Continue reading
एअरफोर्स अधिकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार, धर्मांतराचा दबाव
नागपूर शहरात भारतीय वायू सेनेच्या (एअरफोर्स) अधिकाऱ्याच्या पत्नीशी संबंधित एक गंभीर आणि धक्...
Continue reading
स्मार्ट मीटरवरून संतापाचा स्फोट! 5 शहरांत तीव्र आंदोलन, महावितरणच्या मीटर केबिनला ठोकले टाळे
राज्यात Smart Meter बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात नाग...
Continue reading
अकोला : कॉक्रो जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यावर आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात ...
Continue reading
27 वर्षीय उच्चशिक्षित शिक्षिकेचा धक्कादायक मृत्यू; गोगाबाबा टेकडीवरील घटनेने शहर हादरलेछत्रपती संभाजीनगर शहरातील गोगाबाबा टेकडी परिसरात एका 27 वर्...
Continue reading
Raigad News : रायगडातील झेनिथ व केपी वॉटरफॉल परिसरात ट्रेकिंगदरम्यान वाट चुकलेल्या चेंबूरच्या दोन तरुणांची खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनने थरारक ...
Continue reading
ठाण्यातील कळवा खाडीजवळ 4 वर्षांच्या चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे बुडणाऱ्या 30 वर्षीय तरुणाचे प्राण वाचले. अग्निशमन दल, वाहतूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्था...
Continue reading
पुणे-शिर्डी थेट इंटरसिटी रेल्वे सेवा अखेर सुरू होत आहे. 17 जून रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन होणार. वेळापत्रक, फायदे, धार्...
Continue reading
मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटांत पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन
मुंबई : भारतातील रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र ...
Continue reading
घटनेनंतर मंडळ अधिकारी डी. आर. झापे, तलाठी समीर खान आणि मोहन कुलाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नगरपरिषदेने मृत शेळ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जेसीबीची व्यवस्था केली. तसेच ठाणेदार सचिन पाटील आणि पोलिस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली.
भाजपचे रमेश दुतोंडे यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडे पंचनामा सादर करून नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून, विषबाधेचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने त्वरित मदतीचा हात द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त मजूर कुटुंबांकडून होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/villagers-upset-due-to-chatareet-pushy-type-of-drinking-water-tank-and-rotten-birds-10-serious-questions/