पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी
उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे.
रतन टाटा यांच्या निधनमुळे भारताच्या उद्योग आणि सामाजिक
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा हे
त्यांच्या साधेपणा आणि दानशूर स्वभावामुळे सर्वसामान्यांमध्ये
जास्त प्रचलित होते. भारताला जेव्हा जेव्हा कठीण काळात
मदतीची गरज लागली तेव्हा रतन टाटा यांनी सढळ हातांनी
मदत केली. रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला फक्त यशाच्या
सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं नाही तर त्यांनी माणुसकीदेखील
जोपासली. त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठं काम केलं. अनेक
सामाजिक संघटनांना आर्थिक मदत केली. अनेक सामाजिक
संघटनांसोबत ते जोडले गेले. त्यामुळे देशभरात रतन टाटा यांचं
आदराने नाव घेतलं जातं. रतन टाटा यांच्या निधननंतर संपूर्ण देश
शोकसागरात बुडाला आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल महत्त्वाची
मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न
पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी
पत्राद्वारे केली आहे. तसेच भारतरत्न पुरस्कार हा हयात असतानाच
देण्यात यायला हवा. या विषयी काही निश्चित धोरण असणं
आवश्यक आहे. आपण ते आखाल याची आपल्याला खात्री आहे,
असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.