जे समाजाला अपेक्षित आहे तेच होणे महत्वाचे आहे. केवळ गर्दी
जमली की परिवर्तन होतं असं नाही. प्रत्यक्षात गाठी-भेटी होतं राहतात.
त्यातून निर्णय होणे महत्वाचे आहे. परिणामी हल्ली इतके भावी आमदार
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
झाले आहेत की मला निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघच शिल्लक
राहिला नाही. असा मिश्किल टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला
आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील
निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत.
याबाबत येत्या 30 ऑक्टोंबर ला अंतरवाली सराटी येथे बैठक पार पडणार
आहे. या बैठकीअंती जरांगे पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
त्यापूर्वी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेतेमंडळी आणि
पदाधिकारी येत आहेत. माझी भूमिका पहिल्यापासूनच स्पष्ट आहे. राजकारणात
मला पडायचं नसून निवडणूक लढण्याचा प्रश्नच उभा राहत नाही. आपण दिलेला
शब्द पाळतो. आपल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न
सुरू आहेत. रात्रंदिवस मेहनत करून समाज एक संघ कसा राहील यासाठी
प्रयत्न करत आहोत. समाजाचा अपमान होईल अशा कुठल्याही पाऊल मी
उचलणार नाही. किंबहुना समाजाची गर्दी होत असली तरी व्यक्तिगत निर्णय
समाजावर लादणार नाही. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. राजकीय समीकरण
जुळलं तर समाजाचा विजय आहे. कुठल्याही एका जातीच्या आधारावर निवडणूक
लढता येत नाही. या देशात अशा पद्धतीने कोणीही निवडणूक लढू शकत नाही
ही अक्कल ही मला आहे. असेही ते म्हणाले. राज्याच्या राजकारणात राजकीय
समीकरण जुळणे फार महत्त्वाचे आहे. कुठलाही एका जातीच्या आधारावर
निवडणूक लढवल्या जात नाही. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून आमचे समीकरण
जुळवणे सुरू आहे. येत्या 30 तारखेला त्या अनुषंगाने बैठक असून या बैठकीत
काय होतं हे बघू. तसेच राज्यातील बांधवांना ही सूचना केल्या आहेत की अंतरवाली
सराटीत 29-30 तारखेला गर्दी करू नका. पण इथे गर्दी केल्याने मला काहीही सुचत
नाही. निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ठरवलं जाईल. एकंदरीत समाजाचे वाटोळ
होईल असा निर्णय मला घ्यायचा नाही. असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-third-list-of-25-candidates-released/