मैत्रीचा महाकुंभ : ३० वर्षांनंतर शेंदुर्जनमध्ये शाळा भरली; परदेशातूनही मित्र उपस्थित

शाळा

शेंदुर्जन: काळ बदलला, आयुष्याच्या धावपळीमध्ये प्रत्येकजण गडबडीत होता, तरीही शाळेतील मैत्रीची उब आजही तितकीच घट्ट आहे, याची जाणीव २८ डिसेंबर रोजी शेंदुर्जनमध्ये झाली. वसंतराव नाईक विद्यालय, शेंदुर्जनच्या १९९५-९६ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.

तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांमुळे जणू ‘भावनिक शाळा’च उभी राहिल्याचे चित्र दिसत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेजराव ठोसरे सर होते. सरस्वती पूजन, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त महाराष्ट्रातून नव्हे, तर दुबई व इंग्लंडसारख्या परदेशातूनही माजी विद्यार्थी उपस्थित होते. बारामती, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यासह एकूण ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Related News

कार्यक्रमात शिक्षकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ठोसरे सर, आर. के. वाघ सर, एल. एल. वाघ सर, संतोषराव चेके सर, श्याम बोंद्रे सर आणि सुधाकर गायकवाड सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली, तर शिक्षकांनी शिष्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. दामू अण्णा शिंगणे यांनी केले, सूत्रसंचालन संजय चोपडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम सुरसे यांनी केले. मनोगत, चर्चा व स्नेहभोजनानंतर, पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचा संकल्प घेऊन सोहळा संपन्न झाला.

read also :https://ajinkyabharat.com/kdmc-election-2026-shinde-gatta-huge-uproar-2-big-leaders-resignations-and-internal-malaise/ 

Related News