कोल्हापूर मध्ये मे महिन्यात आंबा घाट इथे पर्यटकांची मोठी गर्दी

कोल्हापूर मध्ये मे महिन्यात आंबा घाट इथे पर्यटकांची मोठी गर्दी

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर

मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे मे महिन्यातच

पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानामुळे

Related News

आंबा घाटात दाट धुके पसरले आहे. हे धुके पाहण्यासाठी आणि

अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक घाटात गर्दी करत आहेत.

रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट हा एक निसर्गसंपन्न

आणि सौंदर्याने नटलेला प्रमुख घाटमार्ग आहे. याच आकर्षणामुळे दरवर्षी पर्यटकांची येथे वर्दळ असते.

मात्र यावर्षीच्या अनपेक्षित मान्सूनपूर्व पावसामुळे मे महिन्यातच

आंबा घाटावर धुक्याची चादर पसरली असून, पर्यटक याचा आनंद घेताना दिसत आहेत.

त्यामुळे आंबा गाव व परिसरात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.

महामार्गाचे काम संथ गतीने :

सध्या मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

घाटातील जवळपास निम्म्याहून अधिक अंतरावर रुंदीकरणाचे काम वेगाने सुरु

असले तरी आंबा घाट ते कोल्हापूर या भागातील काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

यामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/deoughatamadhye-ghadli-durdaii-incident/

Related News