महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 10 लाख एकर शेती पाण्याखाली

10 लाख एकर शेती पाण्याखाली

 राज्यात सलग तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे.

मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी या भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही धोका असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

10 लाख एकर शेती पाण्याखाली गेली असून गावोगाव जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Related News

अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी धरणांमधून पाणी सोडताना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

प्रत्येक धरणावर अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. शेजारील राज्यांकडूनही सहकार्य मागितले जात आहे.

आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आणि 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

काही ठिकाणी जीवितहानी झाल्याची माहिती असून अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर होईल.

सरकारने नागरिकांना “गरजेचे नसेल तर बाहेर पडू नका” असे आवाहन केले आहे. बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पुढील दोन दिवसांत सुरू होतील.

Read also :  https://ajinkyabharat.com/pakistancha-nava-cut-ujhad/

Related News