काल एका कॉनक्लेव्हमध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे)
म्हणाले की पुढल्या एक दोन वर्षांत मुंबई पॉटहोल मुक्त करू, पण
ही तर त्यांची जुनीच टेप आहे. जवळपास अडीच वर्षांपासून त्यांचं
Related News
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
हे घटनाबाह्य सरकार सत्तेवर आहे, गेल्या वर्षीचा किंवा या वर्षीचा
रास्ता घोटाळा असेल, दोन्ही आम्ही एक्स्पोज केलं. पण अजूनही
रस्ते खोदून ठेवले आहेत,अर्धा किलोमीटर देखील रस्त्याच्या
काँक्रिटीकरणाचं काम झालेलं नाही असे सांगत शिवसेना (उबाठा
गट) नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवरून सरकारवर
निशाणा साधला. एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच
पाहिले नाहीत अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. काल संध्याकाळापासून महाराष्ट्रात,
मुंबईत जोरदार पाऊस झाला. काही मिनिटांच्या पावसात राज्यात,
मुंबईतही अनेक भागांत पाणी साचलं,लोकांचे हाल झाले. मुंबई
असो किंवा ठाणे, पुणे या शहरांकडे लक्ष देण्यासाठी कोणीही
नाहीये,तेथे वॉर्ड ऑफिसर नेमलेले नाहीत. मुंबई अक्षरश: ठप्प
झाली. अनेक ठिकाणी ट्राफिक कोंडी झाली, रेल्वेतूम प्रवास
करणाऱ्यांचे हाल झाले, एवढं भयानक चित्र मुंबईने कधीच पाहिलं
नाही. काल पालिकेचा एकही अधिकारी दिसला का? पोलिस
यंत्रणा कुठे होती माहीत नाही, पालक मंत्री कुठे होते, वेस्टन
एक्सप्रेस हायवे पाण्याने कसा भरला ? असे प्रश्न विचारत
आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.
Read also:https://ajinkyabharat.com/torrential-rains-caused-damage-in-the-state/