काल एका कॉनक्लेव्हमध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे)
म्हणाले की पुढल्या एक दोन वर्षांत मुंबई पॉटहोल मुक्त करू, पण
ही तर त्यांची जुनीच टेप आहे. जवळपास अडीच वर्षांपासून त्यांचं
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
हे घटनाबाह्य सरकार सत्तेवर आहे, गेल्या वर्षीचा किंवा या वर्षीचा
रास्ता घोटाळा असेल, दोन्ही आम्ही एक्स्पोज केलं. पण अजूनही
रस्ते खोदून ठेवले आहेत,अर्धा किलोमीटर देखील रस्त्याच्या
काँक्रिटीकरणाचं काम झालेलं नाही असे सांगत शिवसेना (उबाठा
गट) नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवरून सरकारवर
निशाणा साधला. एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच
पाहिले नाहीत अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. काल संध्याकाळापासून महाराष्ट्रात,
मुंबईत जोरदार पाऊस झाला. काही मिनिटांच्या पावसात राज्यात,
मुंबईतही अनेक भागांत पाणी साचलं,लोकांचे हाल झाले. मुंबई
असो किंवा ठाणे, पुणे या शहरांकडे लक्ष देण्यासाठी कोणीही
नाहीये,तेथे वॉर्ड ऑफिसर नेमलेले नाहीत. मुंबई अक्षरश: ठप्प
झाली. अनेक ठिकाणी ट्राफिक कोंडी झाली, रेल्वेतूम प्रवास
करणाऱ्यांचे हाल झाले, एवढं भयानक चित्र मुंबईने कधीच पाहिलं
नाही. काल पालिकेचा एकही अधिकारी दिसला का? पोलिस
यंत्रणा कुठे होती माहीत नाही, पालक मंत्री कुठे होते, वेस्टन
एक्सप्रेस हायवे पाण्याने कसा भरला ? असे प्रश्न विचारत
आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.
Read also:https://ajinkyabharat.com/torrential-rains-caused-damage-in-the-state/