MP Sanjay Raut attack on Jyotiraditya Scindia :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
त्याचे पडसाद अजूनही दिल्लीसह राज्यात उमटत आहे. ज्योतिरादित्य शिंदेंना राऊतांनी असे प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्याने महाविकास आघाडीलाच नाही तर राज्यातील राजकारणाला हादरे बसले.
दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकप आला. एकनाथ शिंदे यांचा सत्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाल्याने उद्धव ठाकरे गटाचा तिळपापड झाला.
त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसेना फोडणाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याला पवारांनी जायला नको होते, अशी प्रतिक्रिया ठाकरे गोटातून उमटली.
Related News
नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली
मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३
वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पे...
Continue reading
पुण्यातील इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शैलेश पवार
यांच्यावर महिलेचा छळ आणि गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने...
Continue reading
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित आहेत.
रोहितच्या ओपनिंग जागेसाठी युवा फलंदाज साई सुदर्शनचं नाव चर्चेत आहे.
सुदर्श...
Continue reading
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
त्यावरून राज्यात खळबळ उडाली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. त्यातच आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठा स्वाभिमानावरून
पुन्हा राळ उडवून दिली. आता हे वाकयुद्ध संपणार की नाही, अशी विचारणा होत आहे.
दरम्यान सत्कार सोहळ्यानंतर उद्धव गट आणि शिंदे गटात शाब्दिक फैरी झडल्या. काल दिवसभर राज्यात त्याचे पडसाद उमटले.
तर राष्ट्रवादीतील दोन्ही गटांनी अधूनमधून गोळीबार केला. भाजपाने पण ठाकरे गटावर तोंडसुख घेतले. त्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पण उद्धव सेनेला खडसावले.
“मराठा समाज सर्व बघतोय. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाजूला सारून न केवळ हिंदुत्वाचा नाही तर मराठा स्वाभिमानाचा अपमान करणारे,
मकाय समजतील?”, असा टोला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्वीटमधून हाणला.
महाराज, इतिहास समजून घ्या
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ट्वीटनंतर ठाकरे गट आक्रमक झाला. संजय राऊतांनी सकाळीच ट्वीट करुन त्याला खरमरीत उत्तर दिले.
त्यामुळे हा वाद आजही संपणार नाही असंच दिसत आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी थोड्यावेळापूर्वी दिल्लीतून जाहीर नाराजी व्यक्त केली.
“महाराज, इतिहास समजून घ्या. ज्योतिरादित्यांनी महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. महादजी शिंदे वीर होते.
त्यांनी दिल्लीपुढे कधी लोटांगण घातलं नाही. दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकवला नाही. हे जरा आताच्या महाराजांनी समजून घेतलं पाहिजे.
एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी म्हणणं नाही. कुणाच्या नावाने देताय याला विरोध आहे. तुम्ही महादजी शिंदे यांची प्रतिष्ठा कमी केली आहे.
तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करत आहात. एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करत आहे. तुम्ही जयाजीराव शिंदे यांच्या नावाने पुरस्कार द्या. आमचं काही म्हणणं नाही
.” असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.
Read more: https://ajinkyabharat.com/chief-minister-koni-basla-mhanje-shahana-tharat-nahi-sanjay-raut-yancha-chief-minister/