महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा थेट परिणाम आता जनतेच्या खिशावर दिसून येतोय.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, फरसबी, गवार, मटार यांसारख्या भाज्यांनी शंभरी पार केली आहे.
यामुळे रोजच्या जेवणाचा खर्च वाढला असून गृहिणींच्या बजेटचा समतोल बिघडला आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
फरसबी, गवार, तोडली, शिमला मिरची यांसारख्या भाज्यांचे दर सध्या १६० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत.
इतकेच नव्हे तर पापडी १२० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो आणि बीट ६० रुपये किलो मिळत आहे.
लिंबूंनीही महागाईची चव घेतली असून ३ नग २० रुपयांना मिळत आहेत.
महागाईचा हा तडका केवळ स्वयंपाकघरापुरताच मर्यादित नाही. गोकुळ दूध दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ झाली आहे
. यामुळे मुंबई-पुण्यात म्हशीचे दूध ७४ रुपये आणि गायीचे दूध ५८ रुपये लिटरला विकले जात आहे.
राज्यातील इतर भागात हे दर थोडेसे कमी असले तरी महागाईचा परिणाम सर्वदूर जाणवतो आहे.
दरम्यान, मुंबईत प्रवास करणाऱ्यांनाही बेस्टच्या बस दरवाढीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
तिकीट दर दुप्पट झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार आला आहे.
महागाईने सर्वसामान्यांच्या जीवनात अस्वस्थता निर्माण केली असून, पुढील काळात अजून किती दर वाढतील,
याची चिंता आता जनतेला सतावत आहे. शासनाने या महागाईवर काही उपाय योजना करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
READ MORE HEREhttps://ajinkyabharat.com/anti-national-bollam-tar-bye-pakistani-artist-india/