कुटुंबीयांचा आक्रोश; विमानतळावर सरकारची मानवंदना
कुवेतमधील अग्नितांडवात मरण पावलेल्या ३१ भारतीय नागरिकांचे पार्थिव
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
हवाई दलाच्या विशेष विमानातून मायदेशी आणण्यात आले.
मृतांमध्ये २३ मल्याळी नागरिकांचा समावेश आहे.
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि राज्यमंत्र्यांनी विमानतळावरच आदरांजली वाहिली.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या कुवेत येथील दुर्घटनेत ४५ भारतीयांचा मृत्यू झाला होता.
हवाई दलाच्या ‘सी- १३०जे’ या विमानातून ते पार्थिव मायदेशी आणण्यात आले.
या ३१ पार्थिवामध्ये केरळमधील २३ नागरिक, ७ तमिळी नागरिक
आणि कर्नाटकातील एका नागरिकाचा समावेश आहे.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री विजयन म्हणाले,
“अनिवासी भारतीय नागरिक हे केरळची जीवनरेखा आहेत.
कुवेतमधील दुर्घटनेत एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय नागरिक मरण पावणे
हे धक्कादायकच आहे.
मृतांच्या कुटुंबीयांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेनंतर कुवेतचे सरकार आणि भारतातील केंद्र सरकारने देखील
उत्तम पद्धतीने समन्वय ठेवून काम केले.
अशा प्रकारच्या दुर्घटना या भविष्यात होऊ नये म्हणून
कुवेत सरकार उपाययोजना आखेल अशी अपेक्षा करतो.”
हे पार्थिव भारतात आणल्यानंतर कोची विमानतळावर
केंद्रीय पर्यटन आणि पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री सुरेश गोपी उपस्थित होते.
या पार्थिवाला विमानतळावरच मानवंदना देण्यात आली.
कोची विमानतळाच्या बाहेर पार्थिव नेण्यासाठी ३५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
यावेळी मृतांच्या कुटुंबीयांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश दिसून आला.
प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.
मृतांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांची
वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी राज्यातील मंत्री के. राजन, पी. राजीव आणि
वीणा जॉर्ज हे समन्वय साधताना दिसून आले.
विरोधी पक्ष नेते व्ही.डी. सतीशन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Read also : पवार – ठाकरे – पटोलेंची आज एकत्र पत्रकार परिषद (ajinkyabharat.com)